वाहून गेल्या 45 वर्षीय महिलेचा मृत्यू देह 12 तासाच्या आत सापडला
हिंगोली प्रतिनिधी
हिंगोली जिल्ह्यात काल झालेल्या अति मुसळधार पावसामुळे हिंगोली तालुक्यातील पळसोना येथील शेतकरी महिला शेतामध्ये काम करत असताना अचानक मोठा पाऊस आला व ती घराकडे जात असताना नाल्यामध्ये मोठा पूर आला होता दरम्यान तिला पावसाचा अंदाज न आल्याने ती काल सायंकाळी पावसामध्ये वाहून गेली होती
गावातील नागरिकांनी व तिच्या घरच्या परिवाराने ओढ्यामध्ये इतरस्त पाहणी केली मात्र ती रात्री कोणत्या ठिकाणी अंधारात मिळून न आल्याने आज रोजी सकाळी च्या दरम्यान तिचा मृतदेह सापडला
बासंबा पोलीस स्टेशनचे
सिरसम चे बीट जमादार नाना राव पोले यांनी त्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तिचा पंचनामा पीएम करण्यात आले
आसून नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे
पुढील चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मल पिल्लू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून
वरील प्रकरणी बासंबा पोलिसात अकस्मात मृत्यूची झाली आहे
सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश पिल्लू यांच्या आदेशानुसार पुढील चौकशी बिट जमादार नानाराव पोले हे करीत आहेत
पुरात वाहून गेलेल्या महिलेच्या नातेवाईकांना तात्काळ तीन लाख रुपयांची मदत करू असे हिंगोलीचे तालुका दंडाधिकारी यांनी महाराष्ट्र 24 न्यूज बोलताना सांगितले
टिप्पणी पोस्ट करा