घरातून निघून गेलेल्या बालकाचा छडा अवघ्या चार तासात लावला
सायबर ,बासंबा पोलिसांची कारवाई
हिंगोली - कनका गावातील १८ वर्षाच्या बालकाने नैराश्यातून बुधवारी सकाळी घरातून निघून गेला. त्यामुळे पालकांनी बासंबा पोलीस ठाण्यात संपर्क साधून मुलगा हरवल्याची तक्रार दिली त्यावरून बासंबा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लु यांनी सायबर विभागाशी संपर्क साधून लोकेशन मिळविले त्यावरून मल पिल्लू यांनी पुढील फिल्डिंग लावून अवघ्या चार तासात नांदेड येथून त्या बालकास ताब्यात घेतले.
बासंबा ठाणे हद्दीतील कणका या गावातील १८ वर्ष्याच्या मुलाने बुधवारी सकाळी नऊ च्या सुमारास नैराश्यातून जीवाचे बरेवाईट करुन घेणार म्हणून घरून निघून गेला होता. त्याचे पालक व नातेवाईक आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध घेत होते. मात्र तो आढळून आला नसल्याने चिंता वाढली होती. त्यानुसार त्यांचे पालक व नातेवाईक तसेच सहायक पोलीस निरीक्षक श्री रोयलावार यांचेकडुन माहिती मिळताच ठाणेदार सपोनि राजेश मलपिलु व हे पो.स्टे. स्टाफसह तात्काळ परिसरात त्याचा शोध सुरु केला .तरी कुठे आढळून आला नाही. त्यानंतर नातेवाईका कडुन मुलाचा मोबाईल नं. घेऊन सायबर सेल विभाग येथील फोजदर कांबळे , यांच्या मदतीने लोकेशन घेतले असता त्याचे लोकेशन नांदेड जिल्यातील भोकर फाटा परिसरातील व प्रवासात असल्याचे समजले त्याबाबत तात्काळ मुलाचे नांदेड येथील नातेवाईकांना माहिती दिली व त्यानंतर २० मिनिटांनी साडे अकराच्या दरम्यान हरवलेला मुलगा नांदेड शहराजवळ मोटार सायकलवर नातेवाईकांना मिळुन आला तो सुखरूप असुन पालकां सोबत आहे.
पोलिसांचे तात्काळ प्रयत्न व सायबर विभाग यांचे जलद गतीने प्रतिसाद दिल्यामुळे अवघ्या चार ते पाच तासात मुलगा सुखरूप पणे मुलगा पालकांच्या स्वाधीन करण्यात आला. यामुळे बासंबा पोलिसांच्या सातर्कतेने हरवलेल्या मुलाचा शोध लागल्याने पालकात समाधान व्यक्त होत आहे. या कामगीरी मुळे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर , अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलिस अधीक्षक यातीश देशमुख यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा