शासनाचे रोखीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठीजिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा रात्री दहा वाजेपर्यंत चालू ठेवावेत- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

शासनाचे रोखीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी
जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा रात्री दहा वाजेपर्यंत चालू ठेवावेत
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश
 
हिंगोली,  प्रतिनिधी 
31 मार्च 2022
 महाराष्ट्र कोषागार नियम 1968 खंड एक नियम क्रमांक 409 अन्वये शासकीय रोखीचे व्यवहार पूर्ण करण्याच्या दृष्टीने दि. 31 मार्च, 2022 रोजी जिल्ह्यातील 
हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा व कोषागार कार्यालये उशिरापर्यंत म्हणजेच रात्री 10.00 वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने