हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्याची उपमुख्यमंत्र्याकडे आ. मुटकुळेंची मागणीं

ओला दुष्काळ जाहीर करण्याची उपमुख्यमंत्र्याकडे आ. मुटकुळेंची मागणीं

महाराष्ट्र 24 न्यूज 
नेटवर्क14 सप्टेंबर 2012

हिंगोली जिल्ह्यात झालेल्या
अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करण्याकरीता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाही. यांच्याकडे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

याप्रकरणी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, २० ते ३० जून या दरम्यानच्या कालावधीत हिंगोली जिल्ह्यातील पेरण्या झाल्या होत्या. त्यामध्ये काही ठिकाणी दुबारा
तिबारा
पेरण्या
करण्यात आल्या होत्या; परंतु पेरण्या पासून सतत पाऊस पडत राहिल्याने पिकांची वाढ झाली बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेती पिकात पाणी साचले असून शेती पिकासह जमिनी खरडून गेल्या आहेत. त्यामुळे अत्यल्प पिके शेतकऱ्यांच्या हातील येतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे

पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत जाहीर करावी या मागणी संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी भेट घेऊन निवेदन सादर केले. केलेल्या मागणीनुसार सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने