राज्यात २० हजार पदांसाठी पोलीस भरती
देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
महाराष्ट्र24 न्यूज
नेटवर्क27 सप्टेंबर 2022
मुंबई राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याच्या बैठकीनंतर २० हजार पदांसाठी - पोलीस भरती करण्यात येणार असल्याचे माध्यमांसमोर सांगितले.
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून आम्ही पोलीस भरतीबाबत निर्णय घेतला आहे. राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार आहेत. ८ हजार पैदांबाबत जाहिरात निघाली असून आणखी १.२ हजार पदांची जाहिरात लवकरच काढण्यात येईल,' अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे."
राज्यातील हजारो तरुण तरुणी गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत होते. काही दिवसांपूर्वी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना तरुणांच्या
रोषाचा सामना करावा लागला होता. सरकारने तत्काळ रिक्त पदांची भरती करावी, अशी मागणी करत नांदेड येथे तरुणांनी फडणवीस यांना घेराव घातला होता. आता अखेर सरकारने या भरती प्रक्रियेबाबत मोठी घोषणा केली आहे...
राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या विविध घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गृहखात्याची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा झाल्यानंतर फडणवीस यांनी पोलीस दलाला सूचना दिल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा