राज्यघटना वाचविण्यासाठी
भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी व्हा
प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांचे आवाहन
महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क
1 नोव्हेंबर 22
भारतीय राज्य घटनेला जातीयवादी भाजपापासून वाचविण्यासाठी कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील हिंगोलीत दाखल होणार्या भारत जोडो यात्रेत येथील आंबेडकरी जनतेनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी आज दि. 1 नोव्हेंबर रोजी हिंगोली येथे बोलतांना केले.
शासकीय विश्राम हिंगोली येथे अनुसूचित जाती विभागाची मार्गदर्शन बैठक घेण्यात आली. या प्रसंगी अनुसूचित जातीचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना सिद्धार्थ हत्तीअंबिरे म्हणाले की, भाजपाच्या मोदी राजवटीत देशात बेरोजगारी, महागाईत वाढ झाली असून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन जगने मुश्कील झाले आहे. भाजपा सरकारने धान्यावर जीएसटी लावल्यामुळे गोरगरिकांना जगणे अवघड झाले आहे. राज्यातील सरकारनेही शेतकर्यांना नुकसान भरपाईचे अनुदान दिले नाही, फक्त फसव्या घोषणा देऊन राज्यातील जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. सर्वसामान्य जनतेसाठी कोणता ठोस निर्णय घेण्याऐवजी हे सरकार राज्यातील रोजगार देणारे मोठमोठे उद्योगही इतर राज्यात नेऊन येथील तरुणांना बेरोजगार करत आहे. त्यामुळे या सरकारला येत्या निवडणुकीत जनतेनी धडा शिकवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश हिंगोली जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग सुमेध मुळे यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्ह्यात भारत जोडे यात्रेच्या स्वागताची जोरदारपणे पूर्व तयारी होत असून जिल्ह्यातील जनतेनी त्यांचे हात बळकट करावेत, असे आवाहन त्यांनी केेले.
मार्गदर्शक बैठकीच्या अध्यक्षस्थानी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश सरचिटणीस व हिंगोलीचे प्रभारी प्रफुल्लदादा सावंत हे होते. अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष व वसमतचे माजी नगरसेवक राजकुमार एंगडे, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश सरचिटणीस प्रफुलदादा सावंत यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग मा. सुमेध मुळे यांनी केले, तर प्रमुख पाहुणे मा. राजकुमार एंगडे, (प्रदेश उपाध्यक्ष)
मा. विशाल इंगोले,
मा. मंगेश कदम( नांदेड जिल्हा अध्यक्ष)
मा. मिलिंद उबाळे, (मा. नगरसेवक)
मा. मिलिंद मोरे, ( ज्येष्ठ नेते)
मा. अरुण वाढवे, (मा. नगरसेवक)
मा. साहेबराव भोकरे, (मा. जिल्हा उपाध्यक्ष)
मा. गुलाबराव हनवते, (मा. जिल्हा उपाध्यक्ष)
मा. सुदामराव खंदारे, (मा. जिल्हा उपाध्यक्ष)
मा. अविनाश गायकवाड, (मा. जिल्हा उपाध्यक्ष)
मा. सतीश रणवीर, (मा. जिल्हा उपाध्यक्ष)
मा. महेंद्र जोंधळे, (मा. जिल्हा उपाध्यक्ष)
मा. शासन कांबळे, ( हिंगोली शहर अध्यक्ष)
मा. युवराज आवटे, ( वसमत तालुका अध्यक्ष)
मा. रोहिदास साखरे, ( वसमत तालुका उपाध्यक्ष)
मा. अरविंद कठाळे, ( वसमत शहराध्यक्ष युवक)
मा.शुभम कांबळे ( शहराध्यक्ष वसमत)
तसेच सचिन मुळे, उत्तम साखरे, समीर जोंधळे, आशिष मुळे, अतुल जोंधळे, सुनील जोंधळे, किरण पाईकराव, संजय पंडित, नितीन पंडित, संतोष थोरात, तुषार पंडित, नितीन शेळके, विश्वनाथ खंदारे शुभम कांबळे के.जी. मस्के इत्यादींची उपस्थिती होती उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा