हिंगोली जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

हिंगोली जिल्हा : हिंगोली जिल्हा वकील संघाच्या सन 2026–27 या कालावधीसाठी होणाऱ्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे आज संपूर्ण हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. वकील संघाचे नेतृत्व कोणाकडे जाणार यावर न्यायालयीन प्रशासन, वकीलांचे हक्क व वकील संघाची पुढील दिशा अवलंबून असल्याने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

       

या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी अ‍ॅड. एम. एन. कदम यांनी उमेदवारी दाखल केली असून त्यांना वकील बांधवांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. दिनांक 14 जानेवारी 2026 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या पत्रानुसार अध्यक्ष पदासाठी तीन उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. त्यामध्ये अ‍ॅड.वैशाली रामराव देशमुख, अ‍ॅड. श्रीधर रामकृष्णराव घुगे आणि अ‍ॅड. मारोती नारायण कदम (अ‍ॅड.एम. एन. कदम) यांचा समावेश आहे.

मतदान दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत होणार असून मतदान पूर्ण होताच मतदान आयोग तात्काळ निकाल जाहीर करणार आहे.

अ‍ॅड. एम. एन. कदम हे अनुभवी, प्रामाणिक आणि सर्वसामान्य वकिलांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. संघटनेत पारदर्शकता, वकीलांच्या समस्या, तरुण वकिलांना संधी व बार असोसिएशनची प्रतिमा उंचावण्याचे त्यांचे ध्येय आहे.

या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील सर्व वकील बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की, आपले एक मौल्यवान मत हिंगोली जिल्हा वकील संघाच्या विकासासाठी वापरा आणि अध्यक्ष पदासाठी अ‍ॅड. एम. एन. कदम यांना बहुमताने विजयी करा.

एक मत – मजबूत वकील संघासाठी,

एक मत – उज्ज्वल भविष्यासाठी!

असा प्रतिसाद हिंगोली जिल्हा वकील संघाच्या सदस्या कडून होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने