हिंगोली प्रतिनिधी - सुधाकर वाढवे (महाराष्ट्र 24न्यूज) :- हिंगोली जिल्ह्यातील चुंचा येथील रहिवासी असलेले रावसाहेब गणपतराव लोमटे वय 53 वर्षे व तुकाराम राघोजी काळे वय 54 वर्षे हे दोघेही राहणार चुंचा येथील रहिवासी होते.
आज दुपारच्या वेळी वारंगा बायपास जवळ मोटरसायकलवर गावाकडे जात असताना भरधाव वेगात असलेल्या ट्रकने चुंचा येथील दोघांना चिरडले यामध्ये दोघेही जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान वाहनचालक लालाजी चिरकुट बिन यांना पोलिसांनी तात्काळ गाडी सह ताब्यात घेतले आहे.
अपघात एवढा भीषण होता की दोघांचेही कपडे आणि रक्ताच्या थारोळ्यात पडून शरीराचे काही भाग अपघातामध्ये वेगळे झाल्याने रोडवर रक्ताचा सडा शरीराचे तुकडे बाहेर पडले होते. बाळापूर पोलिसांनी तात्काळ रस्त्यावरील दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले.
बाळापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हुंडेकर यांनी तात्काळ रस्त्यावर झालेल्या अपघातामुळे ट्राफिक जाम झाली होती. मात्र हुंडेकर यांनी तात्काळ दखल घेत संपूर्ण रस्ता मोकळा करून रहदारीला अडथळा होऊ नये याकरता एक पथक घेऊन संपूर्ण रस्त्यावरील रस्ता मोकळा करत वाहतूक सुरळीत केली.
टिप्पणी पोस्ट करा