नांदापुरचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते विशेष गौरव



नांदापुरचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव

हिंगोली : 
पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते समृध्द गाव स्पर्धेत नांदापुर गावाने यश मिळविल्याबदल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते बुधवारी सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
 कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथे पाणी फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विविध कामे करण्यात आली होती. या स्पर्धेत नांदापुर येथील ग्रामस्थांनी श्रमदानात सहभाग घेऊन  पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी  हातात खोरे, तिकास, टोपले घेऊन काम केले .यामुळे पाणी साठविण्यास मदत झाली. या कामामुळे लाखो लिटर पाणी साठवण करून ठेवले, यामुळे गावात सिंचनासाठी या पाण्याचा उपयोग झाला. त्यात नांदापुर गावाची निवड करण्यात आली.
  जिल्हा अधिकारी कार्यालयात सभागृहात बुधवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते नांदापुर गावाचा सत्कार करण्यात आला. या सत्कारात प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देण्यात आले .यावेळी  तहसीलदार सुरेखा नांदे, गटविकास अधिकारी आदिनाथ आंधळे, ग्रामविकास अधिकारी आर. बी. घुगे, दत्ता बोरकर, गजानन चव्हाण, सुभाष शिंदे, धनंजय उबाळे आदीची उपस्थिती होती.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने