महाजीवीका अभियान अंतर्गत स्वयंसहाय्यता समुहास महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने कर्ज वितरण सोहळ्यात जिल्ह्यातील एकुण 331 महिला बचतगटांना 4 कोटी 4 लाख 30 हजार रुपये चे कर्ज वाटप करण्यात आले.
महा जीविका अभियान अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या स्वयं सहायता समूहास महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने कर्ज वितरण सोहळ्याचे आयोजन आज दिनांक 27 मे रोजी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात 11वाजता आयोजित करण्यात आला होता.या या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांनी केले तर. प्रमुख पाहुणे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे चीफ मॅनेजर बोरकर ,उपमुख्य कार्यकारी डॉ.विशाल राठोड, जिल्हा अभियान व्यवस्थापक. जे.व्ही.मोडके, लेखाधिकारी मनोज पिनगाळे, एस.बी.आय. चे सावंत, पशुसंवर्धन अधिकारी डॉ कदम, एम.जी.बी.बॅंकेचे त्रीपुडे, संदिप अन्नदाते, जिल्हा व्यवस्थापक राजू दांडगे,जिल्हा व्यवस्थापक,विक्राम सारस्वत, जिल्हा व्यवस्थापक किरण गुर्मे, जिल्हा व्यवस्थापक ओमप्रकाश गलांडे, तालुका व्यवस्थापक सिद्धार्थ पंडित , आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेगुंलवार, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रकल्प संचालक डॉ विशाल राठोड यांच्या नेतृत्वाखाली हा कर्ज वितरण मेळावा आयोजित करण्यात आला होता.
महाजीवीका अभियान अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 331 स्वयं सहायता समूहास 4कोटी 4लाख 30 हजार रुपये कर्ज वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू दंडगे यांनी केले तर प्रास्ताविक जे.व्ही. मोडके यांनी केले. हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यातून मोठ्या संख्येने बचतगटांच्या महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आभार जिल्हा व्यवस्थापक किरण गुर्मे यांनी मानले. त्यानंतर राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रम संपन्न करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ पंडित गजानन लोखंडे, रमेश पवार, तानाजी काळे, विष्णू खाडे, आनंत मूळे, उज्वला गायकवाड, आदींनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा