गौरी, गणपती निमित्त अन्न पदार्थांचीखरेदी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन

गौरी, गणपती निमित्त अन्न पदार्थांची
खरेदी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन

 महाराष्ट्र 24न्यूज
29 ऑगस्ट 2022
 हिंगोली  जिल्ह्यातील सर्व गणपती मंडळांना महाप्रसाद वाटप करावयाचा असल्यास त्यांनी अन्न सुरक्षा मानदे कायदा अंतर्गत नोंदणी करुनच महाप्रसादाचे वाटप करावे.

 तसेच गौरी, गणपती निमित्त अन्‍न पदार्थांची खरेदी करताना खबरदारी घ्यावी. मिठाईची  खरेदी करताना  ताजी असल्याची खात्री करुन घ्यावी. खरेदी केलेल्या अन्न पदार्थांचे पक्के बिल घ्यावे, परवानाधारक, नोंदणीधारक पेढीकडूनच अन्न पदार्थांची खरेदी करावी. अनोळखी व्यक्तीकडून अन्न पदार्थांची खरेदी करु नये, भडक रंग असलेली मिठाई खरेदी करु नये, खवा, मावा यापासून तयार केलेल्या मिठाईचे सेवन  24 तासांच्या आत करावे, मिठाईवर बुरशी आढळून आल्यास व मिठाई खराब झाल्याची शंका आल्यास ती सेवन न करता नष्ट करावी. उद्यड्यावरचे अन्न पदार्थ खरेदी करण्याचे टाळावे.
पॅकबंद अन्न पदार्थ खरेदी करताना बॅच नंबर, बेस्ट बिफोर दिनांक, एक्सपायरी दिनांक तपासून खरेदी करावे, खाद्यतेलाचे टिन खरेदी करताना ते गंजलेले  असल्यास खरेदी करु नये. खाद्यतेलाचे पक्के खरेदी बिल घ्यावे. यानंतरही अन्न पदार्थ, मिठाई खरेदी करताना शंका आल्यास अन्न व औषध प्रशासन, हिंगोली कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न), हिंगोली यांनी केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने