जिल्हयात यावर्षी १३८५ गणेश मंडळाची स्थापना पोलीस अधीक्षक राजेश कलासागर
परवाना असलेले ११७२ तर विनापरवाना २१३
पोलीस अधीक्षक यांच्या आव्हानाला हिंगोलीतील गणेश मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 261 गावांमध्ये एक गाव एक गणपती तर संपूर्ण जिल्ह्यात गणेश स्थापना शांततेत्व नियमांचे पालन
हिंगोली
जिल्हयातमध्ये यावर्षी एकुण १३८५ गणेश मंडळाची स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये परवाना असलेले ११७२ गणेश मंडळ असुन विना परवाना २१३ गणेश मंडळ आहेत. जवळपास २६१ गावात एक गाव एक गणपती अशी स्थापना करण्यात आली आहे.
गणेश मंडळाची स्थापना करावी असल्यास संबंधित पोलिस ठाण्यात ऑनलाईन अर्ज करुन परवानगी काढुनच गणेश मंडळाची स्थापना करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. याअनुषंगाने जिल्हयात एकुण १३८५ गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये शहरात २७६ गणेश मंडळ असुन ग्रामीण भागात ११०९ गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यापैकीे ११७२ गणेश मंडळ हे ऑनलाईन परवानगी काढुन स्थापना करण्यात आली आहे. तर २१३ गणेश मंडळाने विनापरवाना गणेश मंडळांने स्थापना केली आहेत. तसेच २६१ गणेश मंडळांनी एक गाव एक गणपती अशाप्रकारे गावात एकच गणपतीची स्थापना केली आहे.
दरम्यान जिल्हयातील १३ पोलिस स्टेशन अंतर्गत १३८५ मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये हिंगोली शहर पोलिस स्टेशन हद्दीत शहरी गणेश मंडळामध्ये ८४ परवाना काढले तर १५ विनापरवाना काढलेले आहेत. औंढा नागनाथ पो.स्टे अंतर्गत शहराभागात २७ परवाना काढलेले तर विना परवाना एकही नाही. औंढा ग्रामीण भागात ५७ परवाना काढलेले असुन २४ गावात एक गाव एक गणपती स्थापना करण्यात आला आहे. कळमनुरी पो.स्टे अंतर्गत शहरी भागात २० परवाना तर ७ विनापरवाना काढलेले असुन ग्रामीण भागात ६१ परवाना काढले असुन ४४ विनापरवाना तर ४० गावात एक गाव एक गणपती स्थापन करण्यात आले आहेत. वसमत शहर पो.स्टे. अंतर्गत शहरी भागात ९९ परवाना काढलेले तर १० विनापरवाना काढलेले असुन ग्रामीण गणेश मंडळामध्ये एकही नाही. सेनगाव पो.स्टे अंतर्गत शहरी भागात १४ गणेश मंडळ परवाना काढलेले आहेत. तर ग्रामीण भागातील १३० परवाना काढले असुन ५ विनापरवाना तर २४ गावात एक गाव एक गणपती स्थापना करण्यात आली आहे. बाळापुर शहरी भागात एकही नाही. ग्रामीण भागातील ८९ परवाना काढुन तर ५२ विनापरवाना गणेश मंडळ असुन ३० गावात एक गाव एक गणपती स्थापना करण्यात आली आहे. हट्टा पोलिस स्टेशन अंतर्गत ग्रामीण भागात १४२ परवाना काढुन तर ९ विनापरवाना गणेश मंडळ असुन यामध्ये १८ गावात एक गाव एक गणपती स्थापना करण्यात आली आहे. कुरुंदा पो.स्टे.अंतर्गत ग्रामीण भागातील ९० गणेशमंडळांनी परवानगी काढुन तर १८ मंडळांनी विनापरवाना स्थापना केली असुन २६ गावात एक गावात एक गणपती स्थापना करण्यात आली आहे.
हिंगोली ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत ग्रामीण भागात ६९ परवाना काढून २६ विनापरवाना तर २६ गावात एक गाव एक गणपती स्थापन करण्यात आला आहे. गोरेगाव पो.स्टे.अंतर्गत ८८ परवानगी काढून तर १६ विनापरवाना गणेश मंडळ स्थापना करण्यात आली असुन २१ गावात एक गाव एक गणपती संकल्पना आंमलात आणली आहे. नर्सी नामदेव पो.स्टे. अंतर्गत ४३ परवाना काढलेले तर ३ विनापरवाना काढले असुन १० गावात एकच गणपती मांडण्यात आला आहे. बासंबा पो.स्टे.अंतर्गत ६५ परवाना काढलेले असुन ५ विनापरवाना काढलेले तर २० गावात एक गाव एक गणपती स्थापना करण्यात आली आहे. वसमत ग्रामीण पो.स्टे.अंतर्गत ९४ परवाना काढलेले तर ३ विनापरवाना काढले असुन २२ गावात एक गाव एक गणपती संकल्पना साकारण्यात आली असुन असे एकुण जिल्हयात १३८५ गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा