हिंगोली वाशिम राष्ट्रीय महामार्गावर कनेरगाव नाका दरम्यान शेतकरी राजकारणी प्रतिनिधीचे आंदोलन
प्रतिनिधी
महाराष्ट्र 24 न्यूज
कनेरगाव नाका
दि.21/09/2022
हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका या ठिकाणी हिंगोली ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर शेकडो शेतकरी बांधव यांच्याकडून विविध मागण्यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या
विविध मागण्या घेऊन शेतकरी रोडवर दिसून आले आहेत, शासनाच्या वतीनेदुष्काळाची घोषणा केली असून त्यामध्ये बरेच तालुके तालुक्यामधील मंडळ हे वगळतांना दिसून येत आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या ह्या अतिवृष्टी मध्ये सर्व शेतकऱ्यांना तात्काळ समावेश करून मदत मिळणे बाबत सर्व शेतकऱ्यांना सरसकट विमा लागू करा, कोरोना काळात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, विज बिल वसुली थांबून शेतकऱ्यांना वीज बिल माफ करा अशा अनेक प्रकारच्या मागण्या शेतकऱ्यांनी या रास्ता रोको मध्ये मांडलेल्या दिसून येत आहेत.
आंदोलनाच्या ठिकाणी
हिंगोली, व सेनगावतालुक्याचे दोन्ही तहसीलदार यांनी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही प्रशासनाला लेखी पत्रव्यवहार करू असे तोंडी आश्वासन दिले.
प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले
टिप्पणी पोस्ट करा