*राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे यांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार ऐकण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातुन तब्बल 200 बसेस ने शिवसैनिक मुंबईत जाणार*
*- आ.संतोष बांगर*
आज *हिंगोली येथे खा.हेमंत भाऊ पाटील साहेब,आ.तानाजी मुटकुळे साहेब व आ.संतोष बांगर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यास जाण्यासाठी हिंगोली येथे पूर्वतयारी बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.*
यावेळी *उपस्थित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खासदार हेमंत भाऊ पाटील ,आमदार तानाजी राव मुटकुळे व आमदार संतोष बांगर साहेब मार्गदर्शन केले* यावेळी *बोलताना आमदार संतोष बांगर साहेब म्हणाले की सर्वसामान्य जनतेची इच्छा होती की शिवसेना व बीजेपी चे सरकार स्थापन व्हावे परंतु जनतेचा विश्वासघात करण्यात आला.त्यामुळे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे कडवट शिवसैनिक असलेले राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे साहेब यांनी सर्वसामान्य जनतेच्या इच्छा पूर्ण केली त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेबांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार ऐकण्यासाठी मुंबई येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी हिंगोली जिल्ह्यातुन हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांना सहभागी होण्यासाठी जायचे आहे म्हणून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे असे आवाहन यावेळी आमदार बांगर यांनी उपस्थितांना केले.*
यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा