हिंगोलीत राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम जिल्हास्तरीय शुभारंभ

*राष्ट्रीय जंतनाशक  दिन मोहीम जिल्हास्तरीय शुभारंभ*
महाराष्ट्र 24 न्यूज 
नेटवर्क
हिंगोली शहरात 
  दिनांक 10/10/2022 रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीमेचे मा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते माणिक स्मारक विद्यालय हिंगोली येथे शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व विद्यार्थी यांना जंत कश्यामुळे होतात याबाबत माहिती विचारली असता सर्व विद्यार्थी यांनी समाधानकारक उतरे दिले,  यावेळी  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शिवाजी पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजेंद्र सूर्यवंशी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कैलास शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ नामदेव कोरडे, मुख्याध्यापक सुरेवाड, वैद्यकीय अधिकारी अझहर देशमुख, डॉ इनायत खान, विस्तार अधिकारी कमलेश ईशी,आरोग्य सहाय्यक डी आर पारडकर,सुनील मुनेश्वर,आरोग्य सहाययिका प्रियंका राठोड, आरोग्य सेविका श्रीमती कांबळे,प्रदीप आंधळे, शैलेश  मुंदडा, गणेश ठोके,मल्हारी चौफाडे, सतीश नलगे,इत्यादी  यावेळी मोहिमेबद्दल जिल्हा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शिवाजी पवार यांनी पुढीलप्रमाणे माहिती दिली जिल्ह्यातील 1290 शाळा व 1192  अंगणवाडी, उपकेंद्र 132, प्राथमिक आरोग्य केंद्र 24, उपजिल्हा रुग्णालय 2, स्त्री रुग्णालय 1, ग्रामीण रुग्णालय 3, जिल्हा रुग्णालय 1, नागरी दवाखाने 3 इत्यादी ठिकाणी हि मोहीम राबविली जाणार आहे सुदृढ आरोग्यासाठी जंतनाशक गोळी ही संजीवनी असून राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम  वर्षातून दोन वेळा राबविण्यात येते याही वर्षी ही मोहीम दिनांक 10/10/2022 रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन   सर्व आरोग्य संस्था, शाळा अंगणवाडीमध्ये राबविण्यात येणार आहे व उर्वरित लाभार्थ्यांना दिनांक 15/10/2022 रोजी मॉप अप राऊंड दिनाचे आयोजन केले आहे या महिन्यामध्ये  1  वर्ष ते 19 वयोगटातील लाभार्थ्यांना गोळी दिली जाणार आहे हि ग्रामीण भाग व शहरी भाग मधील 324322 इतक्या लाभार्थ्यांना दिली जाणार आहे शाळाबाहे विद्यार्थी यांना आशा स्वयंसेखा यांच्यामार्फत ही गोळी दिल्या जाणार आहे आतड्यामधील कृमीदोष बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये होणाऱ्या रक्ताक्षय व कुपोषणास जबाबदार आहे यामुळे  मुला मुलीचे शिक्षणावर व पुढील आयुष्यातील  शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतात यामध्ये तीव्र  कृमीदोष असल्याने विद्यार्थी लवकर आजारी पडतात, लवकर थकतात, अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही त्यामुळे शाळेमध्ये राहण्याचे प्रमाण वाढते  आतड्यामधील क्रमित असे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेमुळे होतात. बालकांमध्ये याचा प्रसार दूषित माती, अस्वच्छ हात स्वच्छ फळे यामुळे वाढतो  भाज्या व अन्नामुळे फार सहजतेने होते शाळा व अंगणवाडी मधून दिली जाणारी जंतनाशक गोळी ही यावर फार परिणामकारक आहे. उद्दिष्ट मुला मुलीचे आरोग्य चांगले ठेवणे उपस्थिती शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे.तरी सर्व नागरिकांनी आपल्या मुला-मुलीला हि गोळी न चुकता शाळा व अंगणवाडी मध्ये जंत नाशक गोळी खाऊ घालावी,स्वच्छ धुवावेत, शौचालयाचा   नियमित वापर, चप्पल व बूट घालावे निर्जंतूत व स्वच्छ पाणी प्यावे, व्यवस्थित शिजलेले अन्न खावे, स्वच्छ पाण्यामध्ये भाज्या व फळीत धुवावेत,  नखे नियमित नखे स्वच्छ ठेवावीत, इत्यादी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने