लग्न समारंभातील होणाऱ्या खर्चावर मरणदारीवर होणाऱ्या अनिष्ठ रूढी परंपरा वर बंदी घालणे

लग्न समारंभातील होणाऱ्या खर्चावर  मरणदारीवर होणाऱ्या अनिष्ठ रूढी परंपरा वर बंदी घालणे 

महाराष्ट्र 24न्युज नेटवर्क
27 एप्रिल 2023 

         जिजाऊ ब्रिगेड हिंगोली तर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी  शेगुलवार  यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी साहेबांनी या विषयावर संवाद साधून चर्चा केली.  यावेळी जिजाऊ ब्रिगेड प्रदेशउपाध्यक्ष ज्योती कोथळकर जिल्हाध्यक्ष कांताबाई कल्याणकर सहसचिव अरुणा अंभोरे कोषाध्यक्ष कांचन  कल्याणकर सदस्य कमल कल्याणकर ,सरस्वती  कोरडे , मनकर्णा कल्याणकर  जिजाऊ ब्रिगेड कार्यकारणी   आदींच्या हस्ते निवेदन देण्यात आले.  वरील विषयाला अनुसरून निवेदनात म्हटले आहे की, अलीकडील काळात लग्न समारंभावर होत असलेली प्रचंड पैशांची उधळपट्टी, प्रि वेडिंग सारखा अनाठाई खर्च, लग्न वेळेवर न लागणे तसेच खूप उशिरापर्यंत आलेल्या वऱ्हाडींना ताटकळत थांबावे लागणे त्यामुळे वेळेचा मोठा अपव्यय होतो. त्याचप्रमाणे मरण दारीवर सुद्धा अंधश्रद्धा, अनिष्टरूढी, कालबाह्य परंपरा वाढत चालल्या आहेत. मृत झालेल्या पुरुषांच्या बायकोची (विधवा महिलेची) अंधश्रद्धेतून हेटाळणी केली जाते. यामधुन बहुजन समाजाने यातून बाहेर पडावे यासाठी आवाहन करण्यात आले. बहुजन समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी तसेच अनावश्यक खर्च टाळण्यासाठी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजी. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी समाजाला काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. लग्न समारंभात मोठ्या प्रमाणावर तरुण पिढी दारू पिऊन डिजेच्या तालावर नाचते. त्यामुळे व्यसनाधींचे प्रमाण वाढत 
चालले आहे. मोठ्या आवाजात डीजे वाजल्यामुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्णकर्कश डिजेच्या आवाजामुळे लग्न समारंभ परिसरातील नागरिकांना मोठा त्रास होतो. या पार्श्वभूमीवर आपण
या सर्व बाबी बंद करण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रातील जिल्हास्तरावर प्रशासनास निवेदन देण्यात आले आपण दिनांक १ मे महाराष्ट्रदिनी संपूर्ण महसूल विभागात डिजे मुक्त लग्न, दारूमुक्त वरात, वेळेवर लग्न हे  ठराव ग्रामपंचायत मार्फत ग्रामसभेत पास करण्यासाठी आपण प्रशासकीय पातळीवर सूचना कराव्यात अशी मागणी आम्ही मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या महिला आपणास करत आहोत.
            विवाह घरी आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी वधू-वरांचे पालक आलेल्या तरुण पिढीला मद्यपानाची व्यवस्था करून देतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत आहे. हे कमी करण्यासाठी विविध सामाजिक राजकीय संघटनांनी पुढाकार घ्यावा. सदर बाबींचे उल्लंघन करणाऱ्या ग्रामपंचायतींवर सक्त कारवाई करण्यात यावी.अशी  निवेदनाद्वारे मागणी केली आहे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने