शिंदे फडणवीस सरकारने दलितमित्रांच्या मागण्यांना न्याय द्यावा.
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
29 एप्रिल 2023
हिंगोली महाराष्ट्र शासनाने गौरोंवित केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र/समाजभूषण पुरस्कारार्थि च्या न्याय मागण्या शिंदे फडणवीस सरकारने तरी मंजूर कराव्यात आणि होत असलेला अन्याय दूर करावा आदी मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री महोदयांना देण्यासाठी, हिंगोलीचे खासदार व शिंदे गटाचे पाठीराखे खासदार हेमंत पाटील ह्यांना हिंगोलीत सुपूर्द करण्यात आले.हिंगोली येथील आकाशवाणी एफ एम केंद्राचा शुभारंभ आभासी पद्धतीने पंतप्रधान मा.नरेंद्र भाई मोदींच्या हस्ते २८ एप्रिल रोजी हिंगोलीच्या रीसाला बाजार परिसरातील जुन्या दूरदर्शन इमारतीत करण्यात त्यावेळेस खासदार हेमंत पाटील ह्यांना सदरील निवेदन महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र /समाजभूषण संघ(रजी.)चे राज्य कार्याध्यक्ष दलितमित्र डॉ.विजय निलावार ह्यांनी दिले.सदरील निवेदनात पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या. दलितमित्र /समाजभूषण पुरस्कारार्थिना एस.टी. महामंडळाच्या ताफ्यातील सर्व बसेस मधून एका साथीदारासह वीना किलोमिटर अटीच्या सह मोफत प्रवास होता त्यात कटोती करण्यात आली असून हा अन्याय दूर करावा,व सर्व प्रकारच्या बसेस मघुन पुनश्च सवलत देण्यात यावी.मागील अनेक शासन कर्त्यानी पुरास्कारार्थिना प्रतिमाह मानधन देण्याच्या जाहीर घोषणा राज्यात हिंगोली सह अनेक ठिकाणी केल्या नंतर ही अद्याप ही मानधन दिल्या गेले नाही ते देणे सुरू करावे,एस.टी.सारखी रेल्वे प्रवास सवलत केंद्र शासना कडून मिळवून देण्यात यावी,तालुका पातळी पासून ते राज्य पातळी पर्यंतच्या विविध विभागाच्या समित्यांवर पुरस्कारार्थी च्या नियुक्त्या करून त्यांच्या माध्यमातून शासकीय धेय्य धोरणांच्या योग्य अंमलबजावणी साठी शासनाने सहकार्य घ्यावे, महात्मा फुले जनारोग्या योजना आणि प्रंतप्रधान आयुष्यमान भारत योजना चा लाभ पुरस्कारार्थी व त्यांच्या कुटुंबीयांना तहय्यात देण्यात यावा. एकंदरीत केंद्र आणि राज्य शासनाच्या लाभार्थी ठरलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना मिळत असलेल्या सर्व योजनांचे लाभ दलितमित्र/ समाजभूषण पुरस्कारार्थिना देण्यात यावेत,अश्या मागण्यांचे निवेदन संघाचे राज्य कार्याध्यक्ष डॉ.विजय निलावार ह्यांनी दिले आहे .ह्या प्रसंगी भाजपा नेते माजी आमदार रामरावजी वडकुते,समाजभूषण माजी प्राचार्य विक्रम जावळे, इलेक्ट्रॉनिक मीडिया चे पत्रकार सुधाकर वाढवे,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त केंद्र प्रमुख एम एम राऊत,आकाशवाणी परभणी चे प्रमुख सतीश जोशी व सीमंतिनी कुंडिकर आदी सह निमंत्रित व पत्रकार उपस्थित होते.ह्या अगोदरही अनेकदा तत्कालीन मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री सामाजिक न्यायमंत्री, गृहमंत्री,परिवहनमंत्री, अर्थ मंत्री,आणि संबंधिताना तसेच ह्या संदर्भातील जबाबदार सर्व विभागाच्या मंत्री महोदयांकडे आणि उच्चाधिकारी मंडळींकडे प्रत्यक्ष भेटून निवेदने देवून संघाच्या वतीने विनंती केली असून फलश्रुती झाली नाही, हे पुरस्कारार्थिंचे दुर्दैवच म्हणावे लागेल,असे डॉ. निलावार ह्यांनी खासदार हेमंत पाटील ह्यांनी सांगितले.मागण्या संदर्भात संघाच्या पदाधिकार्या समवेत तत्कालीन समाज कल्याण मंत्री दिलीप कांबळे आणि धनंजय मुंढे ह्यांनी शासकीय बैठका मुंबईत घेतल्या व सर्व मागण्या मंजूर होण्या जोग्याच आहेत, त्या पूर्ण करू अस आश्वासन दिलं पण पदरी निराशाच आली असही राज्यकार्याध्यक्ष दलितमित्र डॉ.विजय निलावार ह्यांनी म्हंटल.विद्यमान शिंदे फडणवीस सरकार अनेक अभूतपूर्व निर्णय घेत असून दलितमित्र/समाजभूषण पुरस्कारार्थिंच्या न्यायमागण्याचा देखील सकारात्मक विचार करेल अशी आशा आहे अस खासदार पाटील ह्यांनी म्हंटल ह्यासाठी आपल्या मागण्या मुख्यमंत्री महोदयांकडे माझ्या शिफारसी सह सादर करेल अस खासदार पाटील म्हणाले.,
टिप्पणी पोस्ट करा