हत्ता नाईक भागातील शेतकऱ्यांची मागणी
हत्ता नाईक, दि. ८ नोव्हेंबर:- सेनगाव तालुक्यातील हत्ता तांडा ते येलदरी शेत शिवारातून पाटोदा पर्यंत जाणारा पांदण रस्ता तयार करून द्यावा यासाठी प्रशासनास अधिग्रहित करावी लागणारी जमीन शेतकऱ्यांनी स्वतः कोणताही मोबदला न घेता देऊ केली असून तसे लिहून दिले आहे. पांदण रस्त्यासाठी जाणाऱ्या शेतीचा कोणत्याही प्रकारचा मावेजा नको पण पांदण रस्ता करा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयामार्फत पालक मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सेनगाव तालुका मानव विकास निर्देशांकात मागासलेला तालुका म्हणून राज्यभर ओळखला जातो. हत्ता नाईक परिसरातील अनेक गावे येलदरी धरणाच्या पाळू शि असलेली गावे आहेत. सदरील गावे दुर्गम भागात व डोंगराळ भागात मोडतात. त्यामुळे कोणताही अधिकारी कर्मचारी या गावांकडे सहजासहजी फिरकत नाही. तसेच अनेक गावातील ग्रामसेवकही महिन्यातून एखाद्या वेळेस संबंधित गाव चा पदभार असलेल्या गावात जाऊन भेटी देतात.
हत्ता नाईक ग्रामपंचायतीचा पांदण रस्त्यासाठी ठराव...हत्ता तांडा ते येलदरी शिवारातून पाटोदा जाणारा पांदण रस्ता पक्का करून देण्यात यावा. या मागणीसाठी हत्ता नाईक ग्रामपंचायतीने सरपंच विजयमाला हरिभाऊ गादेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या १६ एप्रिल २०२० रोजी ग्रामपंचायत सभेत ठरावही घेण्यात आला होता. तेव्हा सूचक म्हणून महेंद्रा जैस्वाल हे होते. तर या ठरावास शेख हकीम शेख सलीम यांनी अनुमोदन दिले होते. त्यास सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांनी अनुमती दिली होती. असे असतानाही अद्याप पर्यंत रस्ता तयार करून मिळालेला नाही. रस्त्या भावी शेतकऱ्यांचे व शेतमजुरांची अतोनात हाल होत आहेत.
सहजासहजी कोणीही गावात फिरकत नाही यास कारणही तसेच आहे. रस्त्यांचा प्रश्न बिकट आहे. हत्ता तांडा ते येलदरी शेत शिवारातून पाटोदा जाणारा पांदन रस्ता मागील अनेक वर्षांपासून मागणी करूनही शेतकऱ्यांना तयार करून मिळत नाही. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन यांना पत्र देऊन व निवेदने, विनंत्या, आर्जवे करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. आता हत्ता, हत्ता तांडा भंडारी, भंडारी तांडा व पाटोदा येथील शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदने, विनंती अर्ज तयार करून हा पांदन रस्ता द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच हा तांडा ते येलदरी शिवारातून पाटोदा पर्यंत जाणाऱ्या पांदण रस्त्याची लागून अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. या शेत जमिनी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष पांदन रस्ता साठी विनामूल्य कोणत्याही प्रकारचा मागे जाणून घेता देऊ केले आहेत. पांदन रस्ता तयार करून द्यावा केवळ हीच अट शेतकऱ्यांनी घातली आहे. या निवेदनावर संतोष राठोड, लिंबा राठोड, पुंडलिक राठोड, मधुकर राठोड, रंजनाबाई राठोड, नामदेव राठोड, धोंडीबा नरवाडे, विद्याबाई राठोड, धर्मा जाधव आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
إرسال تعليق