औंढा नागनाथ येथे शेतकऱ्याचा खून

*शेतकऱ्यांचा विहिरीत आढळला मृतदेह* 
*खून केल्याचा झाले  निष्पन्न*

हिंगोली- ओंढा नागनाथ येथे पद्धमावती शिवारात विहिरीत एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळला आहे. मयताच्या डोक्यात गंभीर मार लागलेला असल्याने हा खून असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनेचा पंचनामा झाला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी ओंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात हलविला आहे.

रवी वाठ अस मयत शेतकऱ्याच नाव आहे. वाठ हे शेतात रबी च्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. मात्र सकाळी बराच वेळ होऊन ही ते घरी परत न आल्याने त्यांचा नातेवाइकांनी शोध घेतला मात्र ते शेतात कुठे ही आढळून आले नाही. शेवटी विहिरीवर जाऊन पाहतात तर विहिरीत शेतकरी रवी वाठ यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती ओंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोनि वैजनाथ मुंडे यांना समजताच त्यांनी कर्मचाऱ्यासह घटनास्थळ गाठले. नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. 


*डोक्यात आढळले जबर घाव*
शेतकरी रवी वाठ यांचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढल्या नंतर त्यांच्या डोक्यात लोखंडी हत्याराने मारल्याचे आढळून आले. अतिरिक्तस्त्राव झाल्यानेच वाठ यांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. मात्र नेमक मारण्याच कारण काय? याचा पोलीस शोध घेत आहे. 

*गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू* 

विहिरीत शेतकरी वाठ यांचा मृतदेह आढळल्याने, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेतीचा वाद तर सुरू च होता. मात्र आता गुन्हा दाखल झाल्यानंतर खरी परिस्थिती समोर येणार आहे. आता गुन्हा काय दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे हे करत आहेत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने