विहिरीतील पाण्यासाठी सख्या भावाने केला भावाचा खून

*....तो खुनच; विहिरीच्या पाण्यासाठी सख्या भावाने काढला भावाचा काटा*

हिंगोली- ओंढा नागनाथ येथील पद्मावती शिवारात शेतातील विहिरीत एका तरुण शेतकऱ्यांचा शुक्रवारी मृतदेह आढळला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबरोबर काढला तर मयताच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी तपास केला असता, विहिरीचे पाणी पिकाला घेण्याच्या कारणावरून वाद झाल्याचे स्पष्ट झाले. कायमचा काटा काढण्यासाठीच भावाने संपविल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.  तपासाची चक्रे गतीने फिरवून पळून जाणाऱ्या भावाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. मुलाचा आधार घेऊन खून केल्याची कबुली मयतच्या भावाने दिली.

राजू रखमाजी वाट रा. जिरे माळीवला ओंढा नागनाथ अस आरोपी भावाच नाव आहे. आरोपी राजू अन मयत भाऊ रवी रखमाजी वाट(45) यांच्यात वडिलोपार्जित  विहिरीचे पाणी देवाण घेवणीवरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू होते. अनेकदा कडाक्याचे भांडण देखील झाले होते. लोकांनी समजूत घालून दोघा भावांचे वाद मिटविण्यासाठी नागरिकांनीही प्रयत्न केले होते.   मात्र पिकाला पाणी देण्याच्या कारणावरून हे वाद दर वर्षीच उदभवत असत. तो या वर्षी अति टोकाला गेला. रवी वाट हे  19  नोव्हेंबर रोजी रात्री  पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. ते सकाळी बराच वेळ होऊन ही घरी न परतल्याने,  नातेवाइकांनी शेतात जाऊन पाहणी केली तर सामाईक विहिरीत रवी वाट यांचा मृतदेह आढळून आला.  घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि कृष्णदेव पाटील यांना सूचना देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे व ओंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांची तयार केलेली टीम घटनास्थळी पोहोचली. 


*या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली घटनास्थळी धाव*
सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोनी वैजनाथ मुंडे, गुन्हे शाखेचे पोउपनी शिवसांब घेवारे यांनी घटनास्थळी धाव घेत, संपूर्ण घटनेची अतिबारकाईने माहिती घेतली व तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली. तर मयतचा भाऊ राजू वाट हा हिंगोली ते वाशिम मार्गे  प्रवास करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्या दिशेने धाव घेऊन, राजू वाट यास प्रवासा दरम्यान, तात्काळ ताब्यात घेतले. 

*आरोपीने दिली खुनाची कबुली*
पथकाने राजू वाट यास ताब्यात घेतल्या नंतर त्याला विश्वासात घेतले. तर मी व माझ्या दोन मुले गणेश व आदिनाथ असे आम्ही तिघांनी मिळून भाऊ रवी वाट यांचा डोक्यात मारून खून केला व आपल्यावर संशय न येऊ देण्यासाठी विहिरीत फेकून दिल्याची कबुली दिली.   



*आरोपीला केले पोलिसांच्या हवाली*
मुख्य आरोपी असलेल्या राजू रखमाजी वाट व त्याची दोन मुले या सर्वांना ताब्यात घेऊन, ओंढा नागनाथ पोलिसांच्या स्वाधीन केले. विहिरीच्या पाण्यावरून उदभवलेला वाद  अखेर पाण्याजवळच मिटला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने