राज्यात लवकरच भाजपाची सत्ता येणार प्रवीण दरेकर



हिंगोली - राज्यातील महाविकास आघाडी सरकार निष्क्रिय असून, शेतकऱ्यांचे व समाजाचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरल्याचा टोला विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी (ता.२३) झालेल्या  पत्रकार परिषदेत लगावला.

येथील भाजपा कार्यालयात सोमवारी पदवीधर मतदार संघातील भाजप महायुतीचे  उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचार्थ पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, रामराव वडकुते ,नगराध्यक्ष बाबाराव बांगर ,समीर दुधगावकर आदींची उपस्थिती होती.

दरेकर पुढे बोलताना म्हणाले, मराठा आरक्षण काँग्रेसी लोकांना देता आले नाही, परंतू  दिलेले आरक्षण महाविकास आघाडीला टिकविता आले नाही. संसदेमध्ये विधेयक आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा केला असता, न्याय प्रक्रियेत ते विधेयक टिकणार नाही, भविष्यात न्यायालयात आवाहन केल्या जाऊ शकते असे ते म्हणाले. राज्यातील अतिवृष्टीमुळे शेकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, त्यात राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही, वाढीव वीजबिल कुठली ही व्यवस्था केली नसल्याचा आरोप केला आहे.

कोरोना काळात मोदींनी स्वतःकाम केले, मोदींच्या नेतृतावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे बिहार मध्ये भाजपला मतदारांनी भरघोस मतदान केल्याने भाजप अजिंक्य ठरला असल्याचे सांगून मागील बारा वर्षापासून आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांची कारकीर्द निष्क्रिय ठरली आहे. बेरोजगार, पदवीधर नाराज असल्याने यावेळी मात्र पदवीधर मतदार चमत्कार घडेल असे ते म्हणाले.बभाजप महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना प्रचंड मताने निवडून देण्याचे आव्हान ही त्यांनी शेवटी केले.

Post a Comment

أحدث أقدم