रंगाचा बेरंग केल्यास होणार मोठी कारवाई
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर
महाराष्ट्र 24न्यूज प्रतिनिधी
17 मार्च पासुन हिंगोली जिल्हयात मोठया प्रमाणात होळी व धुळीवंदनाचा सण साजरा केला जात आहे. होळी सण साजरा करीत असतांना ऐकमेकांच्या धर्माचा आदर करून, एकमेकांना शुभेच्छा देवुन सण आनंदाने साजरा करावा. बळजबरीने एकमेकास -रंग लावु नये, तसेच दारू पिऊन मोटार सायकलवर कर्कश हॉर्न वाजवीत रस्त्यावर फिरू नये. कोणत्याही ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये अनुषंगाने जवळपास 1000 पोलीस अधिकारी व अंमलदार कर्तव्य बजावत आहेत. सण साजरा करत असतांना कोणीही कायद्याचे उल्लंघन करून किंवा कोणीही सार्वजनिक ठिकाणी दारूचे सेवन करून आरडा ओरड करून कायदा व सुव्यवस्था भंग केल्यास सदर इसमावर वेगवेगळया कलमांन्वये कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी महाराष्ट्र 24 न्यूज ला बोलताना सांगीतले.
कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये म्हणुन चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. प्रत्येक रस्त्यावर व प्रत्येक चौकात पोलीसांचे फिक्स पॉईन्ट व पेट्रोलींग लावण्यात आली असून, काही पोलीस साध्या वेषात सुध्दा कायदा मोडणा-या लोकांची माहिती काढण्यासाठी नेमण्यात आले आहेत. तसेच शहर वाहतुक शाखेतील व प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाहतुक शाखेतील कर्मचा-यांना दारू पिऊन वाहन चालविणा-या लोकांविरूध्द कठोर कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लपुन चोरून दारू विकणा-यांची माहिती घेवुन त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत. मा.जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी दि.18.03.2022 रोजी जिल्हयातील सर्व दारू विकी दुकाणे बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे अवैद्य दारू विक्री होत असल्यास विविध कायद्यान्वये कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगीतले. तसेच विनाकारण त्रास देणा-या लोकांची माहिती पोलीस प्रशासनास द्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी केले आहे.
إرسال تعليق