दोन महिन्यातील दुसरी स्थानबद्धतेची कार्यवाही....!
हिंगोली /-
अवैध हातभट्टी दारु विक्रीचे वारंवार गुन्हे करण्याच्या कारणावरुन मागील दोन महिन्यापुर्वीच मौ.भाटेगांव येथील देविदास आडे यास एक वर्षासाठी परभणी कारागृहामध्ये स्थानबद्ध करण्याची कार्यवाही करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा कळमनुरी शहरातील इंदिरानगर येथील शेख शकील शेख खलील यास गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्यावरुन एक वर्षासाठी परभणी कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी काढले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी मागील दोन महिन्यापुर्वी भाटेगांव येथील देविदास लालजी आडे यास दारू विक्रीचे वांरवार गुन्हयाच्या कारणावरून एक वर्षासाठी परभणी कारागृहामध्ये स्थानबध्द करण्याची कार्यवाही केली. तर पुन्हा दि.२८ मार्च रोजी कळमनुरी शहरातील शेख शकील शेख खलील रा. इंदिरानगर कळमनुरी यास गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याच्या कारणावरून पुन्हा एक वर्षासाठी स्थानबध्दतेची कार्यवाही करून एक वर्षासाठी परभणी कारागृहात रवानगी केली आहे.
सदर कार्यवाही मुळे हिंगोली जिल्हयातील शरिराविरूध्द व मालमत्तेविरूध्द वांरवार गुन्हे करणार्या लोकाचे धाबे दणाणले असून भविष्यात अशाच प्रकारे गुन्हे करणार्या गुन्हेगाराविरूध्द (एमपीडीए कायदयाअंतर्गत) स्थानबध्दतेची कार्यवाही करण्यात येणार आहे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यानी मागील काही महिन्यामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ व ५६ महाराष्ट्र पोलीस कायदया अंतर्गत २७ गुन्हेगाराना हददपार केले आहे. तसेच कळमनुरी येथील कर्तारसिंग हत्यारसिंग टाक रा. इंदिरानगर कळमनुरी व हिंगोली शहरातील इतर एक अशा दोन टोळयावर मोक्का स्वरूपाचा गुन्हा दाखल करून गुन्हेगाराना जेरीस आणले आहे त्यातच एमपीडीए अंतर्गत एक वर्षासाठी कार्यवाही करूण गुन्हेगाराना सळो की पळो करून सोडले आहे. यानंतर सुध्दा ज्या लोकावर दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत त्यांचेवर कठोर कार्यवाही करून हिंगोली जिल्हा गुन्हेगारी मुक्त करणार असल्याचे पोलीस अधीक्षक यानी सांगितले आहे.
तसेच हिंगोली जिल्हयात चोरून लपून चालणार्या अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी दि. २५ मार्च रोजी पासून विशेष मोहिम राबविण्यात येत असून विशेष मोहिमे अंतर्गत आज पर्यंत हिंगोली जिल्हयातील सर्व ठाणे अंतर्गत दारूबंदीचे-११८, जुगार ४१, वाळुचोरी -०३, गुटखा/तबाखु केसेस-०४ मोटारवाहन केसेस ५४५ असे एकुण ७११ केसेस करण्यात आले असून त्यामध्ये एकुण २६६७७५९/-रू चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक यतिश देशमुख
यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हयातील तिनही उपविभागीय पोलीस अधिकारी सर्व ठाणेदार, तसेच स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यानी केली आहे.
إرسال تعليق