पांग्रा येथील शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

पांग्रा येथे गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या......... औंढा नागनाथ तालुक्यातील पांगरा तर्फे लाख येथील कर्जाचा डोंगर वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील लिंबाच्या झाडाच्या फाट्याला बैलाच्या कासऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 26 एप्रिल रोजी सकाळी साडे आठच्या दरम्यान घडली यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असं कर्जमाफीचे प्रकरणेपुन्हा ऐरणीवर आले आहेत. सविस्तर असे की अनील माधवराव देवकर वय 35 वर्षे राहणार पांगरा यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 93 हजार रुपये कर्ज असून खाजगी सुद्धा कर्ज असल्याचे ग्रामस्थ सांगतात कर्जाला कंटाळून अनिल याने शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली असे पोलीस पंचनामा सांगितले असून शेतातील अनिल देवकर यांचे प्रेत शवविच्छेदनासाठी हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात करून सायंकाळी पांगरा येथे  त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले कळमनुरी पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक सूनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार पवन चाटसे. वराडे आधी पुढील तपास करीत आहेत एक मात्र निश्चित शासनाच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या दिरंगाई पणामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केली हे मात्र निश्चित समजावे लागेल

Post a Comment

أحدث أقدم