बासंबा पाटीवर उड्डाणपुलाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन



उड्डाणपुलाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन

हिंगोली 
तालुक्यातील बासंबा फाटा येथे उड्डाणपुलाच्या मागणीसाठी बासंबा गावासह शेकडो गावातील ग्रामस्थांनी तीन तास रस्ता रोको आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्गाचे प्रोजेक्ट अधिकारी व बासंबा पोलीसांनी दहा दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याच्या दिलेल्या आश्वासनामुळे रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.
बासंबा फाट्यावर उड्डाण पूल नसल्याने अपघात वाढत आहेत त्यामुळे या ठिकाणी उड्डाण पूल उभारणी साठी बासंबा व परिसरातील हजारो नागरिकांनी दि.२६ एप्रिल रोजी तब्बल तीन तास राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे प्रोजेक्ट अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी लड्डा, अभियंता सिंघ यांनी दहा दिवसांत याठिकाणी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच बासंबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही.डी.श्रीमनवार यांनी या ठिकाणी अपघात झाल्यास राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍याबरोबर संबंधित विभागावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर व दहा दिवसांत या ठिकाणी उड्डाण पुलाच्या कामाची सुरुवात न केल्यास राष्ट्रीय महामार्ग-१६१ बंद करण्यात येईल. तसेच संबंधित गावांचा सुरळीत प्रवासाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे सांगितल्याने ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन थांबविले.
यावेळी बासंबा गावचे सरपंच बाजीराव घुगे, माजी जि.प.सदस्य विठ्ठल चौतमल, ऍड.विजय राऊत, उपसरपंच विलास वलेकर, तंटामुक्ती अध्यक्ष किशन घुगे, ग्रा.पं.सदस्य मधुकर घुगे, राजू साबळे, गणपत घुगे, माजी पंचायत सदस्य पंढरीनाथ ढाले, माजी जि.प.सदस्य नामदेव नागरे, बांगर बंधू, संतोष बांगर, अंकुश बांगर, निळकंठ ढाले, गुणाराव ढाले, दत्तराव घुगे, बंटी ढाले, दादाराव ढाले, त्रिमख ढाले, दिलीप वैद्य, आकातराव ढाले, जगन घुगे, शंकर पवार, संदीप घुगे, भिरडा येथील सरपंच पारडा येथील ग्रामस्थ याचबरोबर गावातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. दहा दिवसांत प्रश्न मार्गी लागला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. यावेळी बासंबा ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही.डी.श्रीमनावर व पोलीस उप निरीक्षक सुरेश भोसले, मदन पवार, नाना पोले यांनी चोख बंदोबस्त ठेवला.


Post a Comment

أحدث أقدم