विद्यार्थ्यांनी स्वाधार च्या आधारावर निश्चित ध्येय ठेवून यश संपादन करावे .* __ *विवेकानंदजी वाखारे* उपविभागीय पोलिस अधिकारी (ग्रामीण )

*विद्यार्थ्यांनी स्वाधार च्या आधारावर निश्चित ध्येय ठेवून यश संपादन करावे .* __ *विवेकानंदजी वाखारे* उपविभागीय पोलिस अधिकारी (ग्रामीण )
_________________________
हिंगोली : प्रतिनिधी
           भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर 'स्वाधार' योजनेमुळे मागासवर्गीय विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला मोठा आधार मिळत असून विध्यार्थ्यांनी कठोर परिश्रमातून निश्चित एक ध्येय ठेऊन जीवनात मोठं यश संपादन केले पाहिजे असल्याचे मत विवेकानंद वाखारे,उपविभागीय पोलिस अधिकारी ग्रामीण (हिंगोली) यांनी सामाजिक न्याय भवन येथे जयंती सामाजिक समता कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.
          सामाजिक न्याय भवनात दिनांक:  8 एप्रिल रोजी दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सामाजिक कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पपूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी  विवेकानंदजी वाखारे,उपविभागीय पोलिस अधिकारी ग्रामीण( हिंगोली ) प्रमुख उपस्थित समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, राष्ट्रवादी चे प्रफूल सोनवणे, यांच्या हस्ते  स्वाधार योजनेतील पात्र लाभार्थी विध्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभपत्र वाटप करण्यात आले.
      यावेळी उपस्थित विध्यार्थ्यांना बार्टी चे प्रकल्प अधिकारी गोवंदे यांनी बार्टीच्या योजनाची माहिती सांगितली, लाभार्थी विध्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत अशोक इंगोले यांनी केले. तर शेवटी प्रफूल पटेबहादूर यांनी उपस्थिताचे आभार मानले.कार्यक्रमास समाजकल्याण चे कर्मचारी अनंत बिजले, समतादूत  सुरेश पठाडे, सखाराम चव्हाण, रितेश बगाटे, वडकुते,बिहाडे,पौळकर आदी सह विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم