जिल्हयातील सराईत गुन्हेगारांना जिल्हयातुन तीन आरोपीला एक वर्षासाठी केले हद्दपार...!
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क15 सप्टेंबर 2022
हिंगोली
जिल्हायातील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कार्यवाही करणे बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर यांनी सर्व पो.स्टे.प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. त्यावरुन हिंगोली शहर व बासंबा पोलिस स्टेशन, वसमत ग्रामीण पोलिसांनी तीन आरोपींना एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.
हिंगोली शहर, बासंबा व वसमत ग्रामीण यांनी सराईत गुन्हेगारी करणारे इसम नामे १) सय्यद बिलाल सय्यद मुनवर रा. पेन्शनपुरा हिंगोली २) राधेश्याम विठ्ठल हरण रा. सावरखेडा ता. हिंगोली ३) बाबासाहेब संभाजी खरे रा. थोरावा ता.वसमत जि.हिंगोली यांच्या विरुध्द मपोका कलम ५६ (१) (ब) प्रमाणे तडीपार प्रस्ताव पोलीस अधिक्षक कार्यालयात सादर केले. सदरचे प्रस्तावची उपविभागीय उपविभाग कार्यालय, हिंगोली शहर व वसमत यांच्या कडुन पुर्ण चौकशी करुन अंतिम आदेश करीता उपविभागीय अधिकारी हिंगोली व वसमत यांचे कार्यालयात दाखल केले असता उपविभागीय अधिकारी हिंगोली व वसमत यांनी अ.क्र.१ ते २ यांना दि.८ सप्टेंबर रोजी आ.क्र.३ यास दि. ३० जुन रोजी नमुद सराईत गुन्हेगारांना हिंगोली जिल्हयातुन एक वर्षा करीता हद्दपार आदेश पारीत केला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री किशोर कांबळे यांनी सदर प्रस्तावाची चौकशी पूर्ण करुन मा. उपविभागीय अधिकारी कार्यालय हिंगोली व वसमत येथे अहवाल सादर केले. सदर प्रस्तावाची स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय व स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस अंमलदार यांनी वेळोवेळी सदर प्रस्तावा बाबत पाठपुरावा करून हद्दपार कार्यवाही मध्ये मदत केली.
إرسال تعليق