औंढा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळवून देणारच* आ.संतोष बांगर

*औंढा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळवून देणारच*
               *- आ.संतोष बांगर*

*राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्याकडे औंढा तालुक्यासह संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातीलच अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची व्यथा शेतकऱ्यां प्रति प्रचंड कळवळा असलेले हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर  यांनी या अगोदरच मांडल्याने औंढा तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यातील सर्वच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही भेटणारच असल्याचे आमदार बांगर यांनी सांगितले आहे.दि.23/08/2022 रोजी आमदार संतोष बांगर साहेब यांनी औंढा तालुका प्रशासनास औंढा तालुक्यातील जवळपास 35 हजार हेक्टर शेती क्षेत्राचे सतत पडणाऱ्या पावसामुळे व अतिवृष्टीने नुकसान झाल्याचा अहवाल शासन दरबारी मांडण्यास सांगून त्याची अंमलबजावणी ही करून घेतली होती.त्यामुळे मागील वर्षी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेल्या भरपाईप्रमाणेच यावेळेस देखील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही भेटणारच आहे त्यामुळे औंढा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तथाकथित शेतकऱ्यांचा मित्र असल्याचा बनाव करणाऱ्या ढोंगी पुढाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये औंढा तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आमदार संतोष बांगर कटिबद्ध आहेत व राहतील.* 
        तसेच *अतिवृष्टी व सतत पडणाऱ्या पावसानंतर पावसात पडलेल्या खंडामुळे प्रतिकूल परिस्थितीच्या अधिसूचना काढून पिक विम्याची 25% अग्रीम रक्कम शेतकरी बांधवांना मिळावी यासाठी देखील मी शासनाकडे विनंती केलेली आहे असे देखील आमदार संतोष बांगर  यांनी यावेळी सांगितले आहे.*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने