ग्रामसेवकांच्या असहकार आंदोलनामुळे ५६३ ग्रामपंचायतीचे कामकाज तहकूब
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क 7 सप्टेंबर 2022
हिंगोली जिल्ह्यात ग्रामसेवकांचे मासीक वेतन मागील एक वर्षापासून अनियमतपणे होत असून यासाठी जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, यासह इतर मागण्यांसाठी ५६३ ग्रामपंचायतीच्या ३५० ग्रामसेवकांनी मागील शुक्रवारपासून असहकार आंदोलन पुकारले आहे.
यामुळे 563 ग्रामपंचायतीचे कामकाज तहकूब झाले आहे..
हिंगोली जिल्ह्यातील ग्रामसेवकांचे वेतन नियमितपणे अदा करावे, ई निवीदा आहे. व इतर शासकीय कपातीबाबत प्रशिक्षण द्यावे, कोविडमुळे मृत्यू झालेल्या ग्रामसेवकांच्या कुटुंबाला मदत द्यावी, यासाठी हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, कंत्राटी ग्रामसेवकांची १० हजार रुपयांची अनामत रक्कम परत द्यावी, ग्रामसेवकांचे वैद्यकिय प्रतिपर्तीचे देयक अदा न
करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने
करण्यात आली होती.
मात्र संघटनेच्या मागण्यांबाबत प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे संघटनेने आजपासून असहकार आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात ३५० ग्रामसेवक सहभागी झाले आहेत. या आंदोलनामुळे गावपातळीवर ग्रामपंचायतीचे कामकाज तहकूब झाले आहे
जिल्हा परिषदेने या मागण्यांबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास तिव्र आंदोलन केले जाणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पांढरे, सचिव राजेश किलचे, तालुकाध्यक्ष राजकुमार भगत, रवी बिल्लावार, माधव कपाटे, सुरेश झिंजाडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सांगितले..
टिप्पणी पोस्ट करा