प्रत्येक प्रकल्प गुजरातला जाणे वाईट- राज ठाकरे
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
1 नोव्हेंबर 2022
मुंबई: महाराष्ट्रात येणारा प्रत्येक प्रकल्प गुजरातला जातोय हे वाईट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर विचार करण्याची गरज असल्याचे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण राज ठाकरे यांच्या विधानाशी सहमत असून महाराष्ट्र हा कायम गुंतवणुकीत अग्रेसरच राहिला पाहिजे. आपण येत्या दोन वर्षांत महाराष्ट्राला गुंतवणुकीच्या बाबतीत क्रमांक एकचे राज्य बनवू असा विश्वास व्यक्त केला आहे.
पक्ष बांधणीसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मी पहिल्यापासूनच सांगत आलो आहे की पंतप्रधान हे देशाचे हवेत. त्यांना प्रत्येक राज्य हे समान असले पाहिजे, पण वाईट याचे वाटते की जो प्रकल्प येतोय तो गुजरातकडे जातोय. पंतप्रधानांनी याकडे लक्ष दिले पाहिजे असेही राज ठाकरे म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपण राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत असून महाराष्ट्र हे गुंतवणुकीच्या बाबत कायम अग्रेसरच राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले.
إرسال تعليق