हिंगोलीत पीक विमा देणाऱ्या कंपनी चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क18 ऑक्टोंबर 2022
हिंगोली शेतकऱ्यांना पीक विमा देणाऱ्या आयसीआयसीआय • लोम्बार्ड या विमा कंपनीच्या हिंगोली जिल्ह्यातील कारभाराच्या चौकशीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत. आ. संतोष बांगर यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली होती.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नोंदविलेले २३ हजार इंटीमेशन विमा कंपनीने शेताची पाहणी न करता रद्द केल्याचा आ. बांगर यांचा आरोप आहे. या सोबतच शेतावर जाऊन वस्तुनिष्ठपणे सर्वेक्षण करण्यात आला नसल्याचेही आ. बांगर यांचे आरोप आहेत. सर्वेक्षणाच्या कोऱ्या अर्जावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन कंपनीचे हित जोपासण्यासाठी आकडेवारी भरण्यात आल्याचे आ. बांगर यांचे म्हणणे आहे. या सोबतच अनेक ठिकाणी बोगस स्वाक्षऱ्या केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. विमा कंपनीचा या कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारची प्रतिमा
आ. संतोष बांगर यांच्या तक्रारीची दखल
मलीन होत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून विमा कंपनी दोषी आढळल्यास कठोर शासन करावे व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी विम्याचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी आ. संतोष बांगर यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या पत्रावरच मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिले असून ही चौकशी लवकरच पूर्ण होईल व शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास आ. संतोष बांगर यांनी महाराष्ट्र 24 न्यूज ला बोलतांना व्यक्त केला
إرسال تعليق