हिंगोली कळमनुरी रेल्वे गेटवरील पुलाच्या कामामुळे खटकाळी रस्ता तात्पुरता बंद

हिंगोली कळमनुरी रेल्वे गेटवरील पुलाच्या कामामुळे खटकाळी रस्ता तात्पुरता बंद

महाराष्ट्र 24न्युज
 नेटवर्क 2 नोव्हेंबर 2012

हिंगोली शहरातील कळमनुरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे गेटवर पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे सदरील रस्त्यावरील वाहतूक आज २ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर व १५ नोव्हेंबर ते १० जानेवारी २०२३ पर्यंत सदरील रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच नवीन तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता वापरण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
हिंगोली शहरातील कळमनुरीकडे जाणाऱ्या रेल्वे गट नं. ११४ बी येथे रेल्वे पुलाचे काम सुरू आहे. सदर रेल्वे गेट परिस्रात एमआरआयडीसीच्या वतीने पुलाचे काम सुरू असल्याने तात्पुरती वाहतूक बंद करून इतर नवीन पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी ८ ऑक्टोबर २०२२ पासून पुढील ६० दिवसाकरिता रस्ता बंद केला होता. तसेच पर्यायी रस्त्याने वाहतुक करण्याबाबत निर्देश दिले होते. परंतु मध्यंतरी झालेल्या पावसामुळे पर्यायी रस्ता तयार करण्यात आला नसल्याने वाहतूक सुरूच होती. आता एमआरआयडीसीच्या वतीने नवीन पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यानुसार हिंगोली शहरातून कळमनुरीकडे जाणारे ते हिंगोली शहरातून पुढे अकोला बायपास- गारमाळ वरून खटकाळी बायपास त्याच मार्गे कळमनुरीकडुन हिंगोली शहरात येणारे जे मोठे वाहने आहेत ते खटकाळी बायपास येथून गारमाळ, पुढे अकोला बायपास येथून हिंगोली शहरात येतील तर लहान चारचाकी व दुचाकी वाहने सदर वाहने रेल्वे गेट शेजारी तात्पुरते निर्माण केलेल्या पर्यायी मार्गाने जाणार आहेत. ज्यात हिंगोलीकडुन कळमनुरीकडे जाणारे वाहनांचा समावेश आहे. त्यांनी नवीन बनत असलेला रेल्वे पूल त्याखालून उजव्या बाजुने जिनमाता नगर मधील सिमेंट रस्ता पुढे नवीन पर्यायी बनविलेला कच्चा रस्ता समोर जावून रेल्वे भुयारी पुल पुढे खटकाळी हनुमान मंदिर, खटकाळी बायपास असा मार्ग असणार आहे तर कळमनुरीकडुन हिंगोली शहरात येणारे चारचाकी व दुचाकी वाहने हे खटकाळी बायपास येथून पुढे खटकाळी हनुमान मंदिर पुढे समोर जावून उजव्या बाजुने नवीन पर्यायी बनविलेला कच्चा रस्ता समोर जावून रेल्वे भुयारी पुल पुढे जनमाता नगर मधील सिमेंट रस्त्याने हिंगोली शहरात जातील असा नवीन पर्यायी वाहतूक मार्ग असणार आहे. रेल्वे पुलाचे काम सुरू केल्याने २ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर पर्यंत मुख्य रस्ता रहदारी करिता बंद करण्यात आला आहे. तसेच ११ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत खा. राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रा हिंगोली शहरातून जाणार असल्याने नमुदकाळात सदर रेल्वे ब्रिज जवळील काम बंद राहणार असून पुढे १५ नोव्हेंबर ते १० जानेवारी २०२३ पर्यंत परत मुख्य रस्ता रहदारी करिता बंद करून वरील प्रमाणे निर्देश दिले आहेत. त्यानुसार वाहतूकी करिता पर्यायी मार्गाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم