शिंदे - भाजपचे सरकार महाराष्ट्र विरोधीकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप

शिंदे - भाजपचे सरकार महाराष्ट्र विरोधी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप

महाराष्ट्र  24 न्यूज 
नेटवर्क 3नोव्हेंबर 2022
 हिंगोली,  राज्यातील शिंदे करीत असून महाराष्ट्रातील जनता आगामी

व भाजपचे सरकार महाराष्ट्र विरोधी असल्याचे निवडणुकांत त्यांची मस्ती उतरविल्या शिवाय जनतेला कळाले आहे. राहणार नाही, असा इशारा पटोले यांनी यावेळी दिला.

खोटे बोल पण रेटून बोल अशी भूमिक घेत हे सरकार स्वार्थी असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. हिंगोलीत बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील मोठे प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळात बाहेर राज्यात गेल्याचे भाजपाचे नेते माहिती अधिकार कायद्यात उघड झाल्याचे सांगत आहेत. एक एक प्रकल्प बाहेर राज्यात जात असताना लोकशाही व्यवस्थेला दाबून ठेवणारी भाजपची मंडळी माहिती अधिकार कायद्याची भाषा करीत असतील तर त्यांच्या तोंडाला लागायचे नाही, अशी त्यांची भूमिका दिसून येत आहे. राज्यात एकीकडे शेतकरी, तरुणाच्या आत्महत्या होत असताना दुसरीकडे सरकार मस्तीत काम होते.
राज्यात शेतीमालाला योग्य भाव नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. बेरोजगारीमुळे तरुणांच्या आत्महत्या होऊ लागल्या आहेत. यावर राज्य सरकार बोलण्यास का तयार नाही. राज्य सरकारकडून जनतेची लूट सुरु असून यातून राज्याची बदनामी होत आहे, असे सांगत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये सर्वजण सहभागी होऊ शकतात. या यात्रेचे विरोधकांनी राजकारण करू नये. देश तोडणाऱ्यांना देश जोडता येणार नाही, अशी टिकाही त्यांनी विरोधकांवर यावेळी केली. या यात्रेच्या निमित्ताने देश जोडला जात असल्याचे पटोले यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने