राज्यातील सहा मंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ
वाय प्लस एस्कॉर्ट सुरक्षा मिळणारः राज्य सरकारचा निर्णय
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क9 नोव्हेंबर 2022
मुंबई: राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सहा मंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. या मंत्र्यांना वाय प्लस विथ एस्कॉर्ट सुरक्षा देण्यात आली.
उल्लेखनीय म्हणजे महाविकास
आघाडीमधील महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा सरकारने नुकतीच काढून घेतली होती. सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेल्या मंत्र्यांमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, कामगार मंत्री सुरेश खाडे, बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, सहकारमंत्री अतुल सावे, आली होती..
महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा समावेश आहे. या सहा मंत्र्यांना वाय प्लस विथ एस्कॉर्ट सुरक्षा पुरविण्यत आलेली आहे. दरम्यान, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मविआच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती
إرسال تعليق