नावावर शेती नसल्याने कृउबासचे उपसभापती श्रीरामे व जगताप तक्रारीनंतर पितळ पडले उघडे संचालक अपात्र

 नावावर शेती नसल्याने   कृउबासचे उपसभापती श्रीरामे व जगताप  संचालक अपात्र
दोन्ही शिक्षकाचे पितळ पडले उघडे

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
13 सप्टेंबर 2024 
हिंगोलीः शेती हे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत नसल्याच्या कारणावरून हिंगोली बाजार समितीत संचालक असलेल्या दोन शिक्षकांना जिल्हा उपनिबंधकांनी अपात्र ठरविले आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात झाली आहे. या निवडणुकीत डिग्रस कहाळ येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदावर असलेले शामराव जगताप व जयपूर येथील संगमेश्वर विद्यालयात मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले अशोक श्रीरामे या
दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत दोघेही विजयी झाले आहेत. सध्या श्रीरामे हे बाजार समितीचे उपसभापती असून शामराव जगताप हे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीचे दावेदारही जिल्हा आहेत.

उपनिबंधकांच्या या निर्णयामुळे सहकार क्षेत्रासहीत अन्य काही क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदार राजकारण्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, उपसभापती श्रीरामे शामराव जगताप 
यांच्या विरुध्द शंकर पोले यांनी तर संचालक जगताप यांच्या विरुध्द परसराम राऊत यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अपील दाखले केले होते. या दोघांच्याही उत्पन्नाचा मुख्यस्त्रोत शेती नसल्याचे अपीलामध्ये नमूद केले होते. त्यासोबत त्यांनी दोघांचेही वेतन प्रमाणपत्र सोबत
जोडले होते. सदर प्रकरण जिल्हा उपनिबंधक
डॉ. एस. एल. बोराडे यांच्या समोर सुनावणीसाठी आले होते. या प्रकरणात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर बाजार समितीचे उपसभापती अशोक श्रीरामे व संचालक शामराव जगताप यांचे उत्पन्नाचे मुख्यस्त्रोत शेतीपासून नसल्याने त्यांनी बाजार समितीच्या संचालकपदी राहण्यास अपात्र ठरवित असल्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक डॉ. बोराडे यांनी दिला आहे. त्यामुळे दोन्ही शिक्षकांचे तक्रारीनंतर  पितळ उघडे पडले आहे 

या शिवाय वरील निर्णयाविरुध्द ३० दिवसांच्या आत विभागीय सहनिबंधक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे दाद मागता येणार असल्याचे निर्णयात नमुद केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने