हिंगोली पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीची कबुली.शंभरपेक्षा अधिक आरोपी अद्याप फरारचहिंगोली: प्रतिनिधीतब्बल वीस वर्षापूर्वी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपी परभणी येथे आपले नाव आणि वेशभूषा बदलून राहत होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याचा शोध घेतल्यानंतर सुरुवातीला तो मी नव्हेच..! असे म्हणणाऱ्या आरोपीला पोलिसी खाक्या दिसताच तो मीच आहे..! अशी कबुली त्याने दिली.वीस वर्षांपूर्वी हिंगोली शहर पोलिस स्थानकामध्ये सय्यद बशीर सय्यद इस्माईल राहणार पेन्शन पुरा हिंगोली, हल्ली मुक्काम मंगेश नगर परभणी. याच्याविरुद्ध कलम 452, 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सय्यद बशीर हा हिंगोली येथून फरार झाला. दिनांक 15 फेब्रुवारी 2013 रोजी न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. तर 21 फेब्रुवारी 2015 रोजी त्याच्याविरुद्ध स्टॅंडिंग वॉरंट जारी करण्यात आला. अनेक वेळा तपास घेऊन देखील सय्यद बशीर याचा मागमूस लागत नव्हता. दरम्यान पोलीस अधीक्षक राकेश कलासागर अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सय्यद बशीर याचा शोध लावण्यात यश मिळवले.बशीर हा परभणी येथील मंगेश नगर भागात नाव, पत्ता आणि वेशभूषा बदलून राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने बुधवारी बशीर यास ताब्यात घेतले. यावेळी त्याने तो मी नव्हेच..! असे सांगत अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच बशीर याने आपली खरी ओळख कबूल केली. यामुळे वीस वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे, पोलीस कर्मचारी बालाजी बोके, संभाजी लेकुळे, भगवान आडे, विठ्ठल कोळेकर,आशिष उंबरकर, शंकर ठोंबरे, किशोर सावंत कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.मात्र असे हिंगोली जिल्ह्यांमध्ये शंभरपेक्षा अधिक आरोपी अनेक वर्षापासून फरार असल्याचेही पोलिसांनी सांगितले त्यांनाही लवकरच जेरबंद करू असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांनी सांगितले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने