*जिल्ह्यात 26 एप्रिल 2022 ला राष्ट्रीय जंत नाशक दिन मोहीम राबविणार*
आज दिनांक 20/04/2022 रोजी राष्ट्रीय जंत नाशक दिन या मोहिमेच्या निमित्ताने जिल्हा दक्षता समितीची मा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली यावेळी आरोग्य विभाग,शिक्षण विभाग, महिला बाल कल्याण विभाग,यांच्या संयुक्त विद्यमानाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील एकूण शाळा 1290, अंगणवाडी 1192 आरोग्य संस्था सर्व इत्यादी ठिकाणी राबविण्यात येणार आहे, या मोहिमे मध्ये 348069 पात्र लाभार्थी यांना दिनांक 25एप्रिल 2022 रोजी जंतनाशक गोळी देण्यात येणार होती परंतु दिनांक 25 एप्रिल रोजी स्थानिक सुट्टी असल्याकारणाने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम 25 एप्रिल ऐवजी 26 एप्रिलला घेण्यात येत आहे अशा सूचना जिल्हास्तरीय टास्कफोर्स बैठकीतून मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आहेत तसेच ज्या लाभार्थी यांनी त्या दिवशी गोळी नाही घेतली अश्यानी दिनांक 29 एप्रिल 2022 रोजी देण्यात येणार आहे.वयोगट निहाय 1 ते 19 वर्ष वायोगातील लाभार्थी यांना गोळी देण्यात येणार आहे.अंगणवाडीतील लाभार्थी 1 ते 5 वर्ष लाभार्थी 90865 व शाळेतील एकूण लाभार्थी 6 ते 19 वयोगटातील लाभार्थी 249632 तसेच शाळाबाहय लाभार्थी 7572 असे एकूण 348069 लाभार्थी आहेत.तसेच
दि.26/04/2022* रोजी शाळा व अंगणवाडयामध्ये मुलांना (वय वर्ष 1 ते 19) जंतनाशक गोळी खाऊ घालण्याची मोहिम राबवायची आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शिवाजी पवार.
🔺रक्तक्षय (अनिमिया )
🔺पोटदुखी,उलट्या, अतिसार, मळमळणे
🔺भूक मंदावणे
🔺कुपोषण
🔺थकवा व अस्वस्थता
🔺शौचाच्या वेळेस रक्त पडणे
🔺आतड्याला सुज येणे.
🔵 जंताचा प्रादुर्भाव थोपविण्याचे मार्ग
🔺जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुणे
🔺भाज्या व फळे खाण्यापुर्वी व्यवस्थित धुणे
🔺स्वच्छ व उकळलेले पाणी प्यावे.
🔺पायात चपला,बुट घालावेत
🔺नियमित नखे कापावित
🔺शौचालयाचा वापर करावा, उघड्यावर शौचाला बसु नये
🔺परिसर स्वच्छ ठेवावा.
🔵जंताचा नाश केल्याने बालकांना होणारे फायदे
🔺रक्तक्षय (अनिमिया)कमी होतो
🔺बालक क्रियाशिल होते व रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
🔺शारिरीक व बौध्दिक वाढ सुधारते
🔺आरोग्य चांगले राहते.
🔹 *जंतनाशक गोळी- एल्बेंडेझाॅल ४०० मि.ग्रॅम*
🔺वय १ ते २ वर्ष अर्धीगोळी (२०० मि ग्रॅम)क्रश करून पाण्यात विरघळून
🔺वय २ ते 3 वर्ष एक गोळी (४०० मि ग्रॅम) क्रश करून पाण्यात विरघळून
वय:- 3 ते19 वर्ष एक गोळी(400मि ग्रॅम) चघळून खाऊ घालणे.
🔵प्रत्येक शाळा,अंगणवाडीत *दि 26/04/2022* रोजी जंतनाशक गोळी मुलांना प्रत्यक्ष समोर उभे करुन खाऊ घालण्याची मोहिम हाती घ्यावयाची आहे.
शाळाबाहय मुले मुली यांना अंगणवाडी केंद्रात गोळया देणार आहेत.
🔹गोळी खाऊ घालण्यापुर्वी घ्यावयाची काळजी
🔺आहार खाऊ घातल्यानंतर गोळी खाऊ घालणे.रिकाम्या पोटी गोळी खाऊ घालू नये.
🔺प्रत्येक शाळेत एक आरोग्य कर्मचारी उपस्थित राहणार आहे.
🔺आजारी बालकांना गोळी देऊ नये.ते बालक ठिक झाल्यानंतर किंवा वंचित लाभार्थी यांना *मॉप अप राऊंड दिन दि 29 एप्रिल 2022 गोळी देणे.
🔺गोळी दिल्यानंतर २ तास मुलांना शाळा, अंगणवाडीत थांबवून ठेवावे.
🔺गोळी खाल्यानंतर काही दुष्परिणाम दिसल्यास क्षार संजिवनी पाजणे.त्वरीत वैदयकीय अधिकारी यांचेशी संपर्क साधणे.
🔺ज्यामुलांच्या पोटात जंताचे प्रमाण जास्त आहे त्यामुलांना गोळी खाल्या नंतर त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.तेंव्हा घाबरण्याचे काहीही कारण नाही.अशी माहिती *अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर* यांनी दिली यावेळी मा मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजेंद्र सूर्यवंशी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कैलास शेळके,जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, शिक्षण विभाग व महिला बाल कल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ,तसेच शिक्षण विभाग व आरोग्य विभाग शिक्षण विभाग मधील अधिकारी कर्मचारी, आरोग्य सहाय्यक डि आर पारडकर, मौसम चौधरी,मुनाफ,उपस्तितीत होते.
إرسال تعليق