कारवाडी ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी
समिती स्थापन
हिंगोली
शहरालगत असलेल्या कारवाडी ग्रामपंचायतमधील कामकाजाची चौकशी करण्यात आली नसल्यामुळे येथील नागरिकांनी दि.३० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. याची दखल घेऊन जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक पत्र काढुन चौकशी संदर्भात समिती गठीत करुन सखोल चौकशी करण्यात येणार असल्यामुळे आत्मदहन स्थगित करावे असे लेखी पत्र संबंधित ग्रामस्थांना देल्यावरुन आंदोलन स्थगित करण्यात आले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि.३० ऑगस्ट रोजी एक पत्र काढुन अर्जदार मंदाकिनी बालाजी टोंपे, श्रीमती कविता राजकुमार ठाकरे, सय्यद यास्मिन सय्यद फैमोद्दीन यांना कारवाडी ग्रामपंचायतच्या कामकाजाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासित केले आहे. यामध्ये अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांचे संदर्भीय पत्रान्वये ग्रा.पं.सदस्य व गावकरी मंडळी कारवाडी यांनी दि.२९ ऑगस्ट रोजी पोलिस निरीक्षक हिंगोली यांना निवेदन देऊन दि.३० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याची दखल घेऊन जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निवेदनातील सर्व मुद्यांचे वस्तुनिष्ठ सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरावरुन विशेष पथकाची नियुक्ती करुन चौकशी अहवाल १५ दिवसात सादर करण्याबाबत चौकशी समितीस निर्देशित केले आहे. विशेष चौकशी समितीकडून आपल्या निवेदनातील मुद्यानुसार वस्तुनिष्ठ व स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल प्राप्त झाल्यानंतर चौकशी अहवालातील दोषी विरुद्ध नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. यामुळे दि.३० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आत्मदहनापासुन परावृत्त व्हावे असे म्हटले आहे.
दोन आठवड्यामध्ये योग्य ते कारवाई न झाल्यास
पुन्हा जिल्हा अधिकाऱ्यासमोर आत्मदहन करणार असे मंदाकिनी टोम्पे कविता ठाकरे सय्यद यास्मिन सांगितले आहे
إرسال تعليق