जिल्हयातील अवैध धंदे पोलिस प्रशासनाला दिसत नाहीत का?- आ.भास्करराव जाधव यांचा सवाल
शिवसेनेचे भर भावसात तुफान शक्तीप्रदर्शन...!
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क 12 सप्टेंबर 2022
हिंगोली प्रतिनिधी
जिल्ह्यातील प्रत्येक गावात अवैध दारु, जुगार, मटक्यांचे अड्डे आणि अवैध वाळू वाहतूकीचे ठेके सुरु असतांना हिंगोलीच्या पोलिस प्रशासनाला व संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना दिसत नाहीत का? असा रोखठोक सवाल उपस्थित करत विधानसभेतही हा मुद्दा उचलणार असल्याचे शिवसेना नेते आ.भास्करराव जाधव यांनी सोमवारी हिंगोली येथे शिवसेना मेळाव्यात व्यक्त केला. याचबरोबर त्यांनी कळमनुरीचे आ.संतोष बांगर यांच्यावर घणाघाती टिका केली.
हिंगोली येथील महात्मा गांधी चौक परिसरात सोमवार दि.१२ सप्टेंबर रोजी शिवसेनेचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी शिवसेना नेते आ.भास्करराव जाधव हे हिंगोली जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. औंढा नागनाथ येथे अभिषेक करुन आल्यानंतर हिंगोली येथील नांदेड नाका येथे आगमन झाले. यावेळी हिंगोली जिल्हा शिवसैनिकांनी ढोल, ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन गांधी चौकातील सभास्थळापर्यंत पायी रॅली काढण्यात आली होती. येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी हजारो शिवसैनिकांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात एका लोकप्रतिनिधीचे नाव घेऊन अवैध दारुचे अड्डे, मटके, जुगार अड्डे आणि अवैध वाळू वाहतूकीचे ठेके जोरात सुरु असल्याचे सांगितले. यामुळे गावा-गावातील तरुण पिढी बरबाद होत असल्याची खंत शिवसैनिकांसह सामान्य नागरिकांनी व्यक्त केली. त्यावेळी शिवसेना नेते आ.भास्करराव जाधव हे चांगलेच संतापले शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या एका विधानावर त्यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करता तर मग पोलिस प्रशासनाला आणि संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना त्यांच्या हद्दीत असलेले ऐवढे मोठे अवैध धंदे एका विधानसभेच्या आमदाराचे सुरु असल्याचा आरोप करुनही हे अवैध धंदे बंद करता येत नाहीत का ? असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच ही बाब गंभीर असून याकडे हिंगोली जिल्ह्याच्या पोलिसांचे कसे काय दुर्लक्ष होत आहे. मुख्यमंत्री हे आमचे सरकार स्वच्छ सरकार आहे अशी ग्वाही देत असतांना त्यांच्याच गटातील व्यक्तीचे अवैध धंदे सुरु आहेत. हिंगोली जिल्ह्यातील या अवैध धंद्यांवर आपण आवाज उठविणार असल्याचे शिवसेना नेते आ. भास्करराव जाधव म्हणाले. या महामेळाव्याला शिवसेना उपनेत्या ज्योतीताई ठाकरे, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, हिंगोली लोकसभेचे माजी खा.सुभाष वानखेडे, माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, शिवसेना जिल्हाप्रमुख विनायक भिसे पाटील, संदेश देशमुख, माजी आ.डॉ.संतोष टारफे, माजी आ.नागेश पाटील आष्टीकर, रोहिदास चव्हाण, शेतकरी नेते अजित मगर, जिल्हा सहसंपर्कप्रमुख गोपू पाटील, सहसंपर्कप्रमुख डॉ.रमेश शिंदे, जिल्हा संघटक बालासाहेब मगर, सहसंपर्कप्रमुख सुनील काळे, सहसंपर्क संघटक ऍड.रवि शिंदे, माजी जि.प. उपाध्यक्ष उध्दवराव गायकवाड, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, डी.के. दुर्गे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष राजेश पाटील गोरेगावकर, पंडीतराव शिंदे, दिलीप बांगर, युवासेना राज्य विस्तारक दिलीप घुगे, तालुकाप्रमुख आनंदराव जगताप, सखाराम उबाळे, ज्ञानेश्वर झटे, संतोष देवकर, बालाजी तांबोळी, युवासेना जिल्हा युवाधिकारी शिवा शिंदे, उपयुवाधिकारी गणेश शिंदे, नंदू खिल्लारे, कृष्णा भिसे, संतोष सारडा, शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी व हजारो शिवसैनिकांची उपस्थिती होती. शिवसेना नेते आ. भास्कर जाधव म्हणाले की, हिंगोली जिल्ह्यात आज आल्यावर पहिले औंढा नागनाथ येथे नागनाथाचा अभिषेक केला ४० आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी जी गद्दारी केली त्याचा तिसरा डोळा या तमाम शिवसैनिकांच्या रुपाने उघडून येणार्या काळात गद्दारांना एसटी बसने घरी पाठविल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री असतांना हिंदूस्थानात कोरोनाचे संकट आले अशा परिस्थितीत राज्यातील प्रत्येक नागरिकांची कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी आपल्या अंगावर घेऊन ज्या पद्धतीने काम केले ते देशातील प्रथम क्रमांक एकचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना गौरविण्यात आले. याच काळात ते आजारी झाल्यानंतर त्यांच्या मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली याच काळात भाजप आणि या सर्व गद्दारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचे काम केले आहे. त्यामुळे या गद्दारांचे कोणतेही हिंदूत्व नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी गद्दारी केली. उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात प्रत्येक जाती धर्मांच्या नागरिकांना सोबत घेऊन सरकार यशस्वीरीत्या चालवले. आता येणार्या काळातील निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे विशेषतः मुस्लीम बांधवांनी शांततेची भूमिका घेणे गरजेचे असल्याचे शिवसेना नेते आ.भास्करराव जाधव यांनी सांगितले. शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात बोलताना म्हणाले की, आज हिंगोलीत मेघगर्जनेसह मोठा पाऊस सुरु असतांनाही या महामेळाव्याला हजारो शिवसैनिक या ठिकाणी दाखल आज झाले आहेत. हे सर्व शिवसैनिक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यामुळे हिंगोलीत कोणीही कितीही गद्दारी केली तरी त्याला धडा शिकविणारे हे खरे कडवट शिवसैनिक आहेत. त्यामुळे आगामी सर्व निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करून शिवसेनेचा भगवा फडकविणार असल्याची ग्वाही दिली. याप्रसंगी शिवसेना उपनेत्या ज्योतीताई ठाकरे, जिल्हाप्रमुख विनायकराव भिसे, संदेश देशमुख, जिल्हा सहसंपर्कप्रमुख गोपू पाटील, माजी आ.डॉ.संतोष टारफे व शेतकरी नेते अजित मगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अलीबाबा चालीस चोरचे हे सरकार - माजी मंत्री डॉ.जयप्रकाश मुंदडा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपूत्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन खाली खेचत या ४० गद्दारांनी शिवसेनेशी बेईमानी करत भारतीय जनता पार्टीसोबत अलीबाबा ४० चोरचे हे सरकार स्थापन केले आहे. येणार्या काळात या गद्दारांचा पराभव निश्चित असून हिंगोली जिल्ह्यावर आगामी निवडणूकीत शिवसेनेचाच भगवा फडकणार असल्याचा विश्वास माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी व्यक्त केला.
إرسال تعليق