हिंगोलीत भर पावसात 51 फुटी रावणाचे दहन प्रशासनाची उडाली तारांबळ

भर पावसात 51 फुटी रावणाचे दहन 
प्रशासनाची उडाली तारांबळ

हिंगोली प्रतिनिधी
6 ऑक्टोंबर 2022
भारतात दोन क्रमांकाचा दसरा मानलेल्या ऐतिहासिक दसरा महोत्सव
हिंगोलीत भर पावसात रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी रावण दहन करण्यात आले 
यावेळी शासनाची चांगलीच तारांबळ उडाली 
दसऱ्यामध्ये येणारे पर्यटक एक तास झोका मध्ये पावसात अडकून पडले होते 
तर संपूर्ण  दसऱ्यामध्ये चिखल तुडवत महिला पुरुषांनी दसऱ्याचा आनंद घेतला 
मात्र रात्री सतत एक तास पाऊस सुरू असल्याने बऱ्याच दसराच्या मध्ये व्यवसायिकांना मोठा फटका बसला आहे 
रात्री रावण दहन झाल्यानंतर संपूर्ण व्यवसायिकांचे अतोनात नुकसान झाल्याने व्यवसायिकांनी आम्हाला पुन्हा दोन दिवस व्यवसाय करण्यासाठी कालावधी वाढवा अशी मागणी दसऱ्यातील व्यापाऱ्यांनी केली आहे 
दरम्यान आमदार तानाजी मुटकुळे यांनी या दुकानदारांना आश्वासन दिले होते. 
भर 
पावसातही आतिष  बजीचे  आकर्षण ठरले होते

 रात्रीच्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाली त्याला जबाबदार कोण असा प्रश्न
 व्यवसायिकांना पडला आहे
रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी रावणाचे दहन करण्यात आले
कौशल्यदास महाराज यांच्या हस्ते करण्यात आले 
यावेळी आमदार तानाजी मुटकुळे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी सहायक पोलीस अधीक्षक यातिष  देशमुख
तहसीलदार नवनाथ वगवाड 
नायब तहसीलदार मधुकर खंडागळे पत्रकार सुधाकर वाढवे  पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे पोलीस निरीक्षक पंडित कचवे
  , वकील संघाचे अध्यक्ष किरण नर्सीकर, राजेंद्र हलवाई,  गणेश शाहु, गणेश बांगर, नागेश धनमने यांच्या सह इतरांची उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم