पोलीस अधीक्षक राकेश कलाकार यांना निरोप समारंभ उपस्थित कर्मचारी अधिकाऱ्यांना बोलताना झाले होते भावनिक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
28 ऑक्टोंबर 2022
समाजात ज्यांना आपल कोणीच नाही अस वाटते त्यांना पोलीस आपले आहेत असे वाटले पाहीजे याकरीता काम करा पोलीस अधीक्षक श्री. एम. राकेश कलासागर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे अत्यंत भावमय वातावरणात पोलीस अधीक्षक श्री. एम. राकेश कलासागर यांचा  निरोप समारंभ संप्पन्न

मा. पोलीस अधीक्षक श्री. एम. राकेश कलासागर यांची प्रशासकिय कारणास्तव हिंगोली जिल्हा येथुन बदली झाल्याने दिनांक- २६/१०/२०२२ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथील संत नामदेव सभागृहात जिल्हा पोलीस दलाकडुन त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. सदर कार्यक्रमास मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत काळे, सहा. पोलीस अधीक्षक श्री यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विवेकानंद वाखारे, श्री. किशोर कांबळे सर्व पो.स्टे. व शाखेचे अधिकारी व अमंलदार मोठया संख्येने हजर होते. सदर कार्यक्रमात जिल्हा पोलीसांकडुन मा. पोलीस अधीक्षक सरांचे सपत्नीक सत्कार करण्यात आले. सरांच्या कामकाजाबाबत व व्यक्तीमत्वाबाबत मा. अपर पोलीस अधीक्षक व ईतर पोलीस अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले ज्यातुन वातावरण अत्यंत भावनिक  झाले होते. मा. पोलीस अधीक्षक सरांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना त्यांचे हिंगोली येथील ०२ वर्षाचे सेवाचा कालावधी अतिशय शांततेत व समाधानकारक पुर्ण झाले ने फक्त जिल्हा पोलीस दलातिल सहकारी अधिकारी व अंमलदार तसेच हिंगोली जिल्हयातील नागरीक यांचे सहकार्यामुळेच शक्य झाले म्हणुन सरांनी सर्वांचे धन्यवाद माणुन आपण पोलीस म्हणुन काम करतांना जिल्हयातील सर्व घटकातील नागरीकां करीता तळमळीने काम केले पाहीजे पोलीस हे आपले मित्र आहेत अशी भावना नागरीकांत निर्माण झाली पाहीजे यासाठी व विशेष करून समाजात असे काही घटक नागरीक असतात त्यांना आपल कोणीच नाही अस वाटते त्यांना पोलीस आपले आहेत असे वाटले पाहीजे याकरीता काम करा असे मार्गदर्शन केले.

२५ सप्टेंबर २०२० रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. एम. राकेश कलासागर यांनी हिंगोली जिल्हा पोलीचे पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारला होता त्याकाळात कोरोणा महामागीरीने मोठ्या प्रमाणात थैमान घातले होते. पोलीस अधीक्षक साहेबांनी नागरीकानी नियमांचे पालन करावे व कोरोणाचा प्रभाव हिंगोली जिल्हयात वाढू नये व नागरीकांनी कोणताही त्रास न होता जिवनावश्यक वस्तु व इतर सुविधा मिळावे यासाठी विशेष प्रयत्न केले सदर कोरोणा काळात बंदोबस्तामधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेही आरोग्याची विशेष काळजी घेवुन जिल्हयात कारोणाचा व्यापक प्रमाणात प्रभाव होवु नये यासाठी प्रयत्न केले सदर काळात सबंध राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता अशा वेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. एम. राकेश कलासागर  पुढाकार घेवुन पो.स्टे. हिंगोली शहर व जिल्हयातील पो.स्टे. कुरूंदा इ. ठिकाणी रक्तदान शिबीर घेवुन जवळपास ३०० पेक्षा अधिक बॅग उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या 
रक्ताचे नागरीकांकरीता जिल्हा सामाप्य रुग्णालय येथे पुरवठा केले सदर रक्तदान शिबीरात सरांनी स्वतः रक्तदानही केले हाते.

तसेच मागील २ वर्षापासुन पोलीस अधीक्षक सरांनी हिंगोली जिल्ह्यात काम करतांना पोलीस विभाग अधिकाधिक लोकाभिमुख व जनता पोलीस संवाद वाढेल यासाठी मोठया प्रमाणात पोलीस कार्यवाही व अनेक उपक्रम राबवुन प्रयत्न केले.

गुन्हयांना प्रतिबंध व्हावा, गुन्हे घडल्यास त्यात तात्काळ डिटेक्शन व गुन्हेगारांवर जरब रहावे म्हणुन प्रतिबंधीत कार्यवाही याद्वारे त्यांनी हिंगोली जिल्हयात शांतता रहवी म्हणुन कार्य केले. गंभीर अशा सर्व खुनांच्या गुन्हे तात्काळ उघड करून आरोपींना अटक केले. प्रलंबीत गुन्हयाचा जलद गतीने निपटारा व्हावा याकरीता वेळोवेळी मोहिमा घेवुन तसेच बैठका व मार्गदर्शन करून मोठ्या प्रमाणात प्रलंबीत गुन्हे निकाली काढले. याच काळात शिक्षेचे प्रमाण (कन्व्हक्शन रेट) वाढावा म्हणनही मा. सरांनी कोर्ट पॅरवी, तपासीक अंमलदार यांना मार्गदर्शन व बैठका घेवुन जिल्हयातील शिक्षेचे प्रमाण (कन्व्हक्शन रेट) वाढवीण्यासाठी प्रयत्न केले. गुणात्मक दृष्टया गुन्हे तपासाची गती वाढावी म्हणुन आधुनिक तंत्रज्ञान व सुविधा असलेले इन्व्हेस्टीगेशन कार उपलब्ध करून दिले.
मागील दोन वर्षात हिंगोली जिल्हयात जबरी चोरी व दरोडामधील गुन्हे तात्काळ उघडकीस आणले. ज्यात सुराणा नगर येथील रा. रा. पो. बल गट हिंगोली येथील जवानाच्या घरातील दरोडयाचा गुन्हा, एस. बी. आय. बँकेतील कर्मचारी यांचे घरी भरदिवसा झालेली जबरी चोरीचा गुन्हा, राष्ट्रीय महामार्गावरील पार्टी मोड येथील दरोडयाचा गुन्हा, चोंढी फाटा येथील बँकेतील फायर करून जबरी चोरीचा गुन्हा, आखाडा बाळापुर व परीसरात सलग झालेले चडडी बनीयान गॅगचे गुन्हे या व इतर अनेक घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्हयात मा. पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनात स्था. गु.शा. व स्थानिक पोलीसांनी सदरचे गुन्हे उघड केले.

गुन्हेगारांवर जरब राहावी व अटटल गुन्हेगार हे गुन्हेगारी पासुन परावृत्त व्हावे व समाजात शांतता राहावी म्हणुन हिंगोली जिल्हयात (१) कलम ५५ मु.पो. का. प्रमाणे (०६) प्रस्तावामध्ये एकूण २७ इसमांना तडीपार करण्यात आले, (२) कलम ५६ मु.पो. का. प्रमाणे १३ अटटल गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. (३) मोक्का अंतर्गत एकूण १३ इसमांविरुद्ध कार्यवाही करण्यात आली. (४) एम.पी.डी.ए. अंतर्गत ०३ इसमांविरुध्द कार्यवाही करण्यात आले

जिल्हयातील नागरीकांना अडचणीच्या वेळी कमीत कमी वेळात मदत मिळावी म्हणुन सुरू करण्यात आलेल्या डायल ११२ या प्रकल्पासही अधिक गतीमान केले जिल्हा नियोजन समितीमधुन सदर डायल ११२ प्रकल्पाकरीता १५ सुविधायुक्त चारचाकी वाहने व ३५ दुचाकी वाहनांची खरेदी करून ते जिल्हयात सर्व पो.स्टे. वाटप करून सदर प्रकल्प अधिकाधिक बळकट केले.

हिंगोली जिल्हयात महामार्गावरील होणारी चोरीचे प्रमाण, अपघाताचे प्रमाण तसेच पोलीस मदत तात्काळ मिळावी याकरीता एकुण ०६ सेक्अरमध्ये सुसज्ज चारचाकी वाहनातून सेक्टर पेट्रोलींग सुरू केले
जिल्हयात होणारे चोरीचे प्रमाण कमी करणे तसेच इतर अवैध्द कार्यवाहीवर आळा घालण्यासाठी प्रभावी रात्रगस्त होणकरीता इ बिट प्रणाली कार्यान्वीत केली. तसेच जिल्हयात मोठया प्रमाणात ग्राम सुरक्ष दलांची स्थापणा करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

नागरीकांना अडचणीच्या काळात तात्काळ व जवळ मदत मिळावे म्हणुन तसेच तणावाच्या वेळी पोलीसांचे मदत तात्काळ मिळावे यादृष्टीने जिल्हयात हिंगोली शहरात रिसाला बाजार परीसर, मच्छी मार्केट परीसर, अकोला बायपास, चौंडी फाटा, जिंतुर टी पॉईंट, कळमनुरी शहरातील बसस्टॉप परीसर इ. ठिकाणी सर्व सुविधायुक्त पोलीस चौक्यांची निर्मीती केली.

जिल्हयात सामाजिक व जातीय सलोखा अबाधीत रहावे म्हणुन शांतता समिती बैठका, एकता क्रिकेट चषकाचे आयोजन व स्वतः संवेदनशिल भागात भेट इ. माध्यमातुन प्रयत्न करून मागील काळात हिंगोली जिल्हयाची शांतता अबाधीत ठेवली.

गेल्या ०२ वर्षाच्या काळात कोरोणा महामारी काळात व या वर्षीच्या सर्व सण व उत्सव हिंगोली मा. पोलीस
अधीक्षक साहेब यांच्या मागदर्शनात अतिशय शांततेत व कोणतेही गालबोट न लागता संपन्न झाले.
जिल्हयातील नागरीकांना विवीध विषयांवरील तकार अर्ज विवीध कार्यालयात प्राप्त होतात तर असे तकार अर्जावर तात्काळ कार्यवाही होवुन संबधीतांचे समाधान व्हावे याकरीता प्रत्येक गुरुवारी तकार निवारण दिनाचे आयोजन करून अर्जाची निर्गती केली.

मा सरांनी सामाजिक दायीत्वाची जाणीव ठेवत मागील ०२ वर्षात नागरीकांना सोबत घेवुन अनेक

नाविण्यपुर्ण असे उपक्रम यशस्वीरित्या जिल्हयात राबविले.

ज्यात महिलां विरुध्द होणारे अत्याचार व गुन्हे यांचे प्रमाण कमी व्हावे, महिलांमध्ये त्यांचे हक्का व त्यांचे करीता असलेल्या कायदया बाबत जागरूकता निर्माण व्हावी या करीता "जननी कार्यक्रम" चे आयोजन करून, जिल्हाभरात २०० पेक्षा अधिक गावांमध्ये सदर कार्यक्रमाव्दारे महिला व मुलींमध्ये जनजागृती होणेसाठी व्यापक प्रमाणात कार्य केले.

"भरोसा सेल" स्थापन करून त्यात महीला पोलीस अधिकारी व अंमलदार सामाजिक कार्यकर्ते कायदे तज्ञ अशा अनुभवी लोकांची टिम नेमुन छोटया मोठया घरगुती वादाविवाद मधुन तुटणारे हजारो संसार जुळविले तसेच व महीलांवरील घरगुती हिंसाचार याबाबत सुध्दा अनेक प्रकरणात समुपदेशन व मार्गदर्शन करून महीलांवरील असे अन्याया व अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

हिंगोली शहरातील मुख्य बाजारपेठ व शाळा महाविदयालय, बस स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन इ. परीसरात महीला य मुलींवरील होणारे अत्याचाराचे घटना तसेच टवाळखोरां कडुन होणारे त्रास कमी व्हावे या उददेशाने दामिनी पथकाची स्थापना केली सदर दामिनी पथक हे शहरातील वरील ठिकाणी सतत गस्त देत अशा प्रवृत्तींवर मोठया प्रमाणात कार्यवाही केली.

हिंगोली जिल्हयात होणारे प्राणांतीक व ईतर रस्ते अपघाताचे प्रमाण कमी व्हावे तसेच वाहन चालक व नागरीकामध्ये सुरक्षीत वाहन चालविने व वाहतुक नियमांबाबत जागृती निर्माण व्हावी म्हणुन व्यापक प्रमाणात जिल्हयात 'रस्ता सुरक्षा अभियान राबविले ज्यामुळे अशा अपघाताचे प्रमाणात घट व नागरीकांमध्ये जनजागृती होवु शकली.
सुरक्षेकरीता तसेच पुरावा म्हणुन वापरा करीता अधिकाधीक विशेषतः बाजारपेठ परीसर व नागरी वस्तीत सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविले पाहीजेत या उद्देशाने मा. सरांच्या संकल्पनेतुन एक सीसीटीव्ही कॅमेरा माझा शहरासाठी हा उपक्रम राबविला गेला त्यातुन हिंगोली शहर व जिल्हयात नागरीकांनी सरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ५०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे जिल्हयात बसविले.

सर्व सामान्य नागरीक व पोलीसांमधील सुसंवाद वाढला पाहीजे नागरीकांनी निसंकोच पोलीसांना माहीती दिली पाहीजे या करीता समाधान हेल्पलाईन नं. सुरू केले

हिंगोली जिल्हयामध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकांचे तकार अर्ज हे शेतीशी संबधित तसेच जमिनीच्या वादाशी संबंधित असतात. अशावेळी नागरीकांना त्यांच्या शंकाचे निरसन सहज होईल व त्याना त्यांचे अर्जानुसार त्यांचा प्रश्न कुठुन व कसा सोडवावा त्याबाबतची कार्यवाही या करीता मार्गदर्शन मिळेल याकरीता पोलीस अधीक्षक कार्यालय येथे प्रॉपर्टी सेल' ची स्थापणा केली.

मा. पोलीस अधीक्षक साहेबांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन वसमत शहरांने आय एस ओ मानांकन मिळविले. पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे बालस्नेही पोलीस स्टेशन हे उपक्रम सुरू करण्यात आले.

सन २०२२ मध्ये मा. पोलीस अधीक्षक साहेब यांचे मार्गदर्शनाखाली हिंगोली येथे यशस्वीरित्या व भव्य असा २७ व्या नांदेड परीक्षेत्रीय किडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पोलीस कल्याण मागील ०२ वर्षाच्या काळात पोलीस अधीक्षक सरांनी जिल्हा पोलीसांसाठी उपयुक्त असे अनेक

कल्याणकारी योजना राबविल्या व निर्णय घेतल्या

मा. पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली यांचे मार्गदर्शन व संकल्पनेतुन पोलीस मुख्यालय हिंगोली येथील पोलीस कवायत मैदानाची शोभा वाढविणारा तसेच परेड मार्चकरीता आवश्यक असलेला भव्य असा किल्ला बांधण्यात आला

पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सवलतीच्या दरामध्ये घरगुती संसारी उपयोगाचे सर्व साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याकरीता नविन पोलीस कल्याण सबसिडअरी कॅन्टीन इमारत बांधकाम करून कॅन्टीन सुरु केले.

पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कार्यालयात असलेले प्रलंबित प्रकरणे व काम हे जलद गतीने व्हावे म्हणुन त्यांचेकरीता समाधान हेल्पलाईल सुरू करून काम केले.

पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे आरोग्य उत्तम राहीले पाहीजे त्यांना असलेल्या आरोग्याच्या समस्यां बाबत निदान झाले पाहीजे म्हणुन तज्ञ वैदयकिय अधिकारी व सर्व उपकरणांसह ' मेडीकल कॅम्प 'चे आयोजन केले ज्यातुन जवळपास ६०० पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वै. तपासणी करून घेतली.

एकूणच पोलीस व जनता संबंध अधिकाधिक जवळ करण्याकरीता हिंगोली पोलीस दलाची कार्यक्षमता वाढावी म्हणुन व हिंगोली पोलीस दल अधिकाधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. सरांनी हिंगोली पोलीस दल व सबंध हिंगोली जिल्हयासाठी केलेले कार्य व प्रेम सर्वांच्या नेहमी स्मरणात राहील.

Post a Comment

أحدث أقدم