हिंगोली जिल्हयात ओला दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या वतीने शुक्रवारी ता. २८ दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो शेतकरी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी परतीच्या पावसाने नुकसान होत असतांना आमदार राजू नवघरे विदेश दौऱ्यावर होते. त्यांच्या विदेश दौऱ्याचीच चर्चा यावेळी सुरु होती.
हिंगोलीत काढण्यात आलेल्या या मोर्चात राष्ट्रवादीचे माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या डॉ. प्रज्ञा सातव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, आमदार राजू नवघरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनिष आखरे, डी. एन. अडकिणे, बी. डी. बांगर, तालुकाध्यक्ष माधव कोरडे, संजय दराडे, ठाकुरसिंग बावरी, शिवाजी शिंदे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. सदर मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून निघाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यावेळी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यानी मार्गदर्शन केले.
मोर्चात हल्लाबोल पन्नास खोके एकदम ओके
घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालय समोर भव्य मोर्चा काढण्यात आला होता
हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळग्रस्त जिल्ह्याला जे निकष लागू होतात ते निकष लागू झाले पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी व उद्योगासाठी कर्ज घेत असतांना सिबिल स्कोरची अट लावू नये, पिकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा मिळाला पाहिजे. परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे, दरवर्षी वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान होत असून या संदर्भात योग्यती उपाय योजना करावी. जिल्हा परिषद भरतीवरील
स्थगिती उठवावी, पोलिस भरती प्रक्रिया तातडीने सुरु करावी या सह इतर मागण्या मांडण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे देण्यात आले.
आमदार नवघरेंच्या दौऱ्याचीच चर्चा
वसमत तालुक्यात परतीच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील सोयाबीनच्या सुड्या वाहून गेल्या. यावेळी आमदार राजू नवघरे विदेशात अभ्यास दौऱ्यासाठी गेले होते. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून आमदारांचा विदेश दौरा यावेळी चर्चेचा विषय बनला होता. त्यांना शेतकऱ्यांसाठी विदेश दौरा लांबणीवर टाकता आला नाही का असा सवाल यावेळी उपस्थित केला जाऊ लागला होता. तसेच आक्रोश मोर्चाच्या आडून उच्चपातळी बंधाऱ्यांची परवानगी मिळविण्यासाठी राजकिय दबाब टाकण्याचा प्रयत्न असल्याचेही बोलले जात होते
यापूर्वी वसमत तालुक्याला दिलेला . निधी शिंदे सरकार यांनी थांबविला असे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी मोर्चामध्ये बोलताना सांगितले
إرسال تعليق