शासनाने ओबीसीच्या हितासाठी चांगले निर्णय घेतले .. कैलासराव खर्जुले..!

अनेक चांगले निर्णय घेतल्याने शासन ओबीसींच्या हिताचे- कैलास खर्जूले

महाराष्ट्र 24 न्यूज
 नेटवर्क
09 ऑक्टोंबर 2022

हिंगोली. राज्यात मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शासनाने ओबीसी संदर्भात अनेक महत्वपूर्ण निर्णय हाती घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे हे शासन ओबीसीच्या हिताचे असल्याची माहिती भाजपा युवानेते तथा भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष कैलास खर्जूले यांनी दिली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या निती मंडळाने प्रत्येक जिल्ह्यात २ असे ७२ वस्तीगृह


सुरू करण्याचा निर्णय घेतला. तसेच ओबीसी, व्हिजेएनटी प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ ५० विद्यार्थ्यांना दिला जाणार, तसेच ओबीसी समाजातील पीएचडी व स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देऊन सक्षम करण्याचा निर्णय देखील मंत्रीमंडळांने घेतल्याने हे शासन ओबीसीच्या हिताचे निर्णय घेत असल्याची माहिती भाजपा युवानेते तथा भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष कैलास खर्जूले यांनी महाराष्ट्र 24न्यूज बोलताना सांगितले

Post a Comment

أحدث أقدم