9महिन्यात 11 हजार कोटींचे सायबर फसवणूक
गृहमंत्रालयाची आकडेवारी
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
28 नोव्हेंबर 2024
नवी दिल्लीः देशभरात सायबर फसवणुकीचे प्रकार वाढत असून गंभीर बाब म्हणजे २०२४ च्या पहिल्या ९ महिन्यांत भारताला सायबर फसवणुकींमुळे अंदाजे ११,३३३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) या गृह मंत्रालयाच्या (MHA) विभागाने गोळा केलेल्या आकडेवारीमधून ही माहिती समोर आली आहे.
यामध्ये स्टॉक ट्रेडिंगमध्ये झालेल्या फसवणुकीचा आकडा सर्वाधिक असून अशा फसणुकींमध्ये ४,६३६ कोटी रुपयांचे नुकसान झाले, ज्यासंबंधी
२,२८,०९४ तक्रारी मिळाल्या होत्या. तर गुंतवणुकीसंबंधी फसवणुकीच्या १,००,३६० तक्रारीमधून ३,२१६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर 'डिजिटल अरेस्ट' संबंधित ६३,४८१ तक्रारींमधून १,६१६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, सिटीझन फायनान्शिअल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग अँड मॅनेजमेंट सिस्टम (CFCFRMS) च्या डेटानुसार २०२४ मध्ये जवळपास १२ लाख सायबर फसवणुकीच्या तक्रारी मिळाल्या आहेत. तसेच २०२१ पासून ण्इण्हेंश्ए कडे ३०.०५ लाख तक्रारींची नोंद झाली आहे, ज्यामध्ये २७,९१४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
पीएम मोदींनी दिला होता सावधगिरीचा इशारा
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी 'मन की बात'च्या ११५व्या कार्यक्रमात बोलताना 'डिजीटल अरेस्ट' फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. कोणतीही सरकारी यंत्रणां एखाद्या व्यक्तीची फोन किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून चौकशी करत नाहीं, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले होते.
إرسال تعليق