नवाब मलीक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन
हिंगोली, - महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलीक यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा या मागणीसाठी गुरुवारी भाजपाच्या वतीने आंदोलन करीत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार रामराव वडकुते, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष बाबराव बांगर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पु चव्हाण, सरचिटणिस फुलाजी शिंदे, मिंलिद यंबल, शहराध्यक्ष प्रशांत सोनी, उमेश नागरे, संदिप वाकडे, रजनी पाटील, नगरसेवक ऊमेश गुठ्ठे , राजु यादव तालुकाध्यक्ष संतोष टेकाळे, अशोक ठेंगल, शंकर बोरुडे, नारायण खेडेकर, कृष्णा ढोके,महेश शहाणे, श्रीरंग राठोड, ओम कोटकर, रजनिश पुरोहित, संजय ढोके, शाम खंडेलवाल, उज्वला खोलगाडगे, आशिष जयस्वाल , सचिन शिंदे, सखाराम मुटकुळे ,विजय धाकतोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे नेहमीच देशद्रोही लोकांच्या पाठीशी उभं राहिलं आहे. नवाब मलिक यांचे जमीन खरेदी प्रकरण असो किंवा याकूब मेननची फाशी रद्द करण्यासाठी धडपडणाऱ्या अस्लम शेख यांना मंत्रिपद देणं असो हे सगळे प्रकार महाविकास आघाडीच्या देशद्रोहाचे चालती-बोलती उदाहरणे आहेत. दाऊदची प्रॉपर्टी खरेदी करताना दाऊदला वाचवणं हा उद्देश होता की त्याच्यासोबतचे व्यावसायिक संबंध अधिक मजबूत करायचे होते याचं उत्तर महाविकास आघाडीने दिलं पाहिजे. पण चोर तो चोर आणि वर शिरजोर असं नवाब मलिक यांच्या बाबतीत महाविकास आघाडीचे धोरण आहे. त्या विरोधात हिंगोली येथील भारतीय जनता पार्टी तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा यासंदर्भात आंदोलन करुन निवेदन देण्यात आले.
إرسال تعليق