**राजकारणातील नैतिकतेचा ऱ्हास हे लोकशाही समोरील *प्रमुख आव्हान* - डॉ संदीप तुडूंरवार
हिंगोली - शिवाजी महाविद्यालय हिंगोली येथे १९ ऑक्टो. रोजी राज्यशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय लोकशाही समोरील समकालीन समस्या आणि आव्हाने" या विषयावर एकदिवशीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उदघाटन डॉ. विलास आघाव (अध्यक्ष, राज्यशास्त्र अभ्यास मंडळ, स्व.रा.ती.म. विद्यापीठ,नांदेड) यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय परिषदेसाठी बीजभाषक म्हणून डॉ. संदीप तुडूंरवार ( राज्यशास्त्र विभाग प्रमुख, श्री बिनझानी नगर महाविद्यालय, नागपूर) हे उपस्थित होते. त्यांनी आपला बीजभाषणात समकालीन भारतीय राजकारणात नैतिकतेचा ऱ्हास होत असल्याने लोकशाही समोरील समस्या वाढलेल्या आहेत, या समस्या दूर करून भारतीय लोकशाही सदृढ करावयाची असल्यास येथील नागरिकानांनी जागरूक असणे महत्त्वाचे आहे. भारतीय संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार नागरिकांना दिलेला आहे, परंतु सद्यस्थितीत प्रचलीत व प्रस्थापित व्यवस्थेच्या व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणे हा गुन्हा ठरत आहे. अशा पद्धतीने सत्तेचा वापर होत असेल तर भारतीय लोकशाही व्यवस्था कोलमडण्यास वेळ लागणार नाही, स्वातंत्र प्राप्ती नंतर चे नेतृत्वमध्ये जी त्यागाची , देशाप्रती समर्पणाची भावना होती, ती आजच्या लोकप्रतीनिधी मध्ये कमी झाली आहे, राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, मधू लिमये यासारख्या नेतृत्त्वां मुळे भारतीय लोकशाही ची प्रतिष्ठा टिकून असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले, इंग्लंड मध्ये तेथील लोक जागरूक असल्याने तेथील नेतृत्वावर लोकांचा वचक आहे,तेथील राजकारणात नीती मूल्यांना महत्व आहे.असे आपल्या देशात दिसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
या परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कांतराव पोले (वेंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव, लातूर) , डॉ बी एम नरवाडे, (श्री दत्त महाविद्यालय, हदगाव) डॉ. विशाल पतंगे, (पीपल्स कॉलेज, नांदेड) डॉ. बालासाहेब जोगदंड,(सीताबाई कॉलेज अकोला) डॉ. डी.जी.नरवाडे (गोदावरी कॉलेज अंबड) डॉ दत्ताजी मेहत्रे (राजीव गांधी महाविद्यालय, मुदखेड), डॉ विरभद्र स्वामी ( यशवंत कॉलेज, नांदेड) हे उपस्थित होते. या परिषदेच्या उदघाटन समारंभाचे अध्यक्ष श्री शिवाजीराव पवार ( माजी शिक्षणाधिकारी) हे होते, प्राचार्य डॉ बी जी गायकवाड, उपप्राचार्य डॉ बाळासाहेब क्षिरसागर, डॉ सुखनंदन ढाले हे उपस्थित होते.
राष्ट्रीय परिषदेमध्ये उदघाटन कार्यक्रमानंतर टेक्निकल सत्रामध्ये डॉ बी.एम. नरवाडे, यांनी भारतीय लोकशाही समोरील समस्या व आव्हाने यावर मार्गदर्शन केले, डॉ. विशाल पतंगे, ( पीपल्स कॉलेज, नांदेड) यांनी "भारतीय लोकशाही च्या यशस्वीतेसाठी सुधारणात्मक उपाययोजना" या विषयावर मत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोर इंगोले, तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बी. जी. गायकवाड व आभार डॉ. रामभाऊ भाकरे यांनी मानले
إرسال تعليق