माझी वसुंधरा अभियानात हिंगोली पालिकेने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला अरविंद मुंढे
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
29 सप्टेंबर 2024
हिंगोलीः माझी वसुंधरा अभियानांतर्गत हिंगोली पालिकेने उत्कृष्ठ कामगिरी करून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. पालिकेने २५ हजार वृक्षलागवड, ४ ठिकाणी घनवन करून हवेचे प्रदुषण मोजणारे यंत्र उभारून त्यानुसार रोपे लागवड केली आहे. पालिकेला ४ कोटी रुपयांचे पारितोषीत मिळाले आहे.
हिंगोली पालिकेने मागील वर्षभरात विविध उपक्रमांमध्ये उत्कृष्ठ कामगिरी बजावली आहे. मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी पुढाकार घेऊन तत्कालीन नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, शाम माळवटकर, देवीसिंग ठाकुर, संदीप घुगे, शिवाजी घुगे, विनय साहू यांच्यासह कर्मचाऱ्यांना सोबत घेत
हिंगोली पालिकेने राबविलेल्या प्रत्येक उपक्रमात नागरीकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. त्यामुळेच पालिकेला राज्यस्तरीय पुरस्कारावर नांव कोरता आले आहे. नागरीकांनी या पुढेही पालिका प्रशासनाला सहकार्य करावे.
नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहे. विशेष म्हणजे या सर्व उपक्रमामध्ये पालिकेने नागरीकांचाही सहभाग घेतला आहे. दरम्यान, हिंगोली शहरात पालिकेने नर्सरी तयार करून त्यातील २५ हजार रोपांचा लागवड करून त्याचे संगोपन केले आहे. या शिवाय कोरोना काळातील ऑक्सीजनचे महत्व लक्षात घेऊन शहरात चार ठिकाणी घनवन तयार करून ऑक्सीजन हब तयार केले आहेत. तसेच
शहरातील सर्व १७ प्रभागातील कचरा एकत्रीत करून डंम्पींग ग्राऊंडवर त्यावर प्रक्रिया करून खत तयार केले असून या खताचा शहरात लावलेल्या रोपांसाठी वापर केला आहे. त्यामुळे रोपांची चांगलीच वाढ झाली आहे. याशिवाय शहरात हवेचे प्रदूषण मोजण्यासाठी यंत्र उभारले असून ज्या भागात प्रदुषण जास्त आहे त्या ठिकाणी वृक्षलागवड केली शिवाय स्वच्छता
राखून परिसर प्रदूषण मुक्त केला आहे. सुका कचऱ्याची विल्हेवाट लाऊन त्याची प्रयोगशाळेला विक्री करून पालिकेच्या उत्पन्नात काही प्रमाणात का होईना भर पडली आहे. शहरातील नागरीकांना शुध्द पाणी पुरवठ्यावर भर दिला असून त्यासाठी वेळोवेळी जलशुध्दीकरण केंद्राला भेटी देऊन आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले तसेच जलेश्वर तलावातील पाण्याचे शुध्दीकरण केले आहे. हिंगोली पालिकेच्या कर वसुलीचा फंडा कमालीचा यशस्वी झाला असून प्रत्येक प्रभागात शिबीर आयोजित करून कर वसुली केली जाते. या उपक्रमाचे राज्याच्च्या पथकाने कौतूक केले आहे. पालिकेच्या या उपक्रमाबद्दल पालिकेला राज्यात दुसरा क्रमांक मिळाला असून शहरातील नागरिकांच्या सहकार्यामुळे ४ कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली आहे. असे महाराष्ट्र 24 न्यूज ला बोलताना मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी सांगितले
إرسال تعليق